काँग्रेसचं भारत तोडो अभियान? खासदार म्हणतो, "आम्हाला दक्षिण भारत स्वतंत्र द्या!"
01-Feb-2024
Total Views | 48
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प दि.३१ फेब्रुवारी रोजी मांडला. यावेळी अपेक्षेप्रमाणेच लोकप्रिय घोषणा टाळण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे गेल्या दहा वर्षात देशात झालेल्या आर्थिक परिपर्तनाचा लेखाजोखा अर्थसंकल्पात बघावयास मिळतो.पंरतु अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस खासदार डीके सुरेश यांनी केंद्रावर दक्षिण भारतीय राज्यांना निधी न दिल्याचा आरोप केला.
ते म्हणाले की, भविष्यात दक्षिण भारतीय राज्ये स्वत:साठी वेगळ्या देशाची मागणी करू शकतात आणि वेगळे राष्ट्र बनू शकतात. तसेच दक्षिणेकडील राज्यांमधून जमा होणारा पैसा उत्तरेकडील राज्यांमध्ये वापरला जात आहे. हा कथित ‘अन्याय’ असाच सुरू राहिल्यास त्यांना (दक्षिण राज्यांना) वेगळ्या देशाची मागणी करण्यास भाग पाडले जाईल, असा इशाराही काँग्रेस खासदाराने दिला.
याला प्रत्युत्तर म्हणून बेंगळुरू दक्षिणमधील भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेस खासदारावर त्यांच्या फुटीरतावादी भाषेवर टीका केली आहे. त्यांनी लिहिले, "काँग्रेस पक्षाचा 'डिव्हाईड अँड रुल'चा इतिहास असताना, त्याचे खासदार डीके सुरेश आता आता पुन्हा एकदा युक्ती खेळत आहेत, त्यांना उत्तर आणि दक्षिण भारत विभागण्याची इच्छा आहे." पण आम्ही हे कधीच होऊ देणार नाही. लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ आणि त्याचं काँग्रेसला फळ भोगावं लागेल, असे ही तेजस्वी सुर्या म्हणाले.