मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंसकारांवरून राजकारण करणाऱ्या काँग्रेसला भाजपचे खडे बोल!

    29-Dec-2024
Total Views | 166

gandhi nadda

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगभरातील नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. भारतामध्ये त्यांच्या कार्यकतृत्वाचं स्मरण करत,त्यांचा गौरव करण्यात आला. परंतु निव्वळ राजकीय स्वार्थ शोधणाऱ्या काँग्रेसने यावर सुद्धा राजकरण करण्याचा निर्णय घेतला. डॉ. मनमोहन सिंग या विभूतिच्या अंतिम संस्कारांसाठी निवडलेल्या स्थाळावरून काँग्रेसने गदारोळ केला आहे. विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर माजी पंतप्रधानांचा अपमान केल्याचे दावा केला आहे. अशातच आता भाजपचे पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राहुल गांधी व त्यांच्या काँग्रेस पक्षाला खडे बोल सुनावले आहेत.

९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेल्या सिंग यांचे अंतिम संस्कार हे दिल्लीच्या निगमबोध घटावर करण्यात आले. अंतिम संस्कार झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला व ते म्हणाले की ज्या समाधी स्थळाची निवड केली गेली, ती योग्य नव्हती. भाजपने योग्य तो आदर सन्मान सिंग यांना मिळवून दिला नाही. त्यांच्यासहीत शीख संप्रादायचा सुद्धा अपमान केला आहे असे राहुल गांधी.

सुपर पीएमचे वर्चस्व!
राहुल गांधी यांच्या याच टीकेचा समाचार घेत भाजप पक्षाध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले की  मनमोहन सिंगजी  यांच्या मृत्यूवर अत्यंत घाणरेडे राजकारण काँग्रेसकडून केले जात आहे. जीवंतपणे ज्या काँग्रेसने मनमोहन सिंग यांचा अपमान केला, त्यांनी त्यांच्या मृत्यू पश्चात असे वर्तन करावे ही अत्यंत दुर्देवाची बाब आहे. हा तोच काँग्रेस पक्ष आहे, ज्याने पंतप्रधानपदाला काळीमा फासला होता. मनमोहन सिंगजी ज्यावेळेस भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांच्या कारभारात हस्तक्षेप करणाऱ्या सोनिया गांधी या सुपर पीएम म्हणून काम करत होत्या. यानंतर गांधी परिवारवर निशाणा साधत नड्डा म्हणाले की गांधी कुटुंबीयांनी कधीही बिगर काँग्रेस नेत्यांचा सन्मान केला नाही. माजी पंतप्रधान असलेल्या नरसिंह राव यांच्या निधनानंतर दिल्लीच्या राजघाट संकुलात त्यांच्या स्मृतीप्रीत्यार्थ समाधी स्थळ बांधण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु सुपर पीएम असलेल्या सोनिया गांधी यांनी तसे होऊ दिले नाही.

 
अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121