बोट अपघातातील मृत व्यक्तींना योग्य ती मदत करण्यात येईल!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

    18-Dec-2024
Total Views | 46
Boat Accident

नागपूर : नीलकमल बोट अपघातातील ( Boat Accident ) जखमी आणि मृत व्यक्तींना योग्य ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. बुधवार, १८ डिसेंबर रोजी एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल बोटीचा अपघात घडला असून यात आतापर्यंत एकाचा मृत्यू आणि ५ जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

हिवाळी अधिवेशनादरम्यान, सुरुवातील उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत अपघातातील मृतांना सरकारकडून मदत करण्याची मागणी केली. त्यानंतर भाजप आमदार महेश बालदी यांनीदेखील हा मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी अपघाताचा व्हिडीओ पाहिला आहे. ती बोट अतिशय वेगाने आली असून बहुतेक तिचा कंट्रोल गेला आणि तिने प्रवाशी बोटीला धडक दिली. या दुर्घटनेतील किती लोक गहाळ झाले याचा आकडा लक्षात येत नाही. पण अंदाजे ७ ते ८ असा हा आकडा आहे. काही लोक पर्यटक असतात आणि ते बाहेरचे असतात. त्यामुळे यासंदर्भात ठामपणे सांगण्यास थोडा वेळ लागतो. सुदैवाने अपघात स्थळावर योग्य वेळी मदत पोहोचल्याने अनेक लोकांना वाचवता आले आहे. काही लोक अजूनही सापडलेले नाहीत. पण निश्चितपणे जखमी आणि मृत व्यक्तींना योग्य ती मदत केली जाईल," असे आश्वासन त्यांनी दिले.

बचावकार्यासाठी सर्व यंत्रणा तैनात करण्याचे आदेश!

एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121