आधी मेट्रोला विरोध आणि आता सभेसाठी आदित्य ठाकरेंचा त्याच मेट्रोने प्रवास, नेटकरी म्हणाले हा तर दुटप्पीपणाचा कळस!

    16-Nov-2024
Total Views | 46

Aaditya thackeray
 
मुंबई : (Aaditya Thackeray) सरकारी योजना, सरकारचे प्रकल्प यांना आधी विरोध करुन आडकाठी निर्माण करायची आणि नंतर त्याच सरकारच्या योजनांची नाव घेत मतं मागायची, त्याच सरकारी प्रकल्पातून निर्माण झलेल्या सोईसुविधांचा लाभ घ्यायचा, हे काही उद्धव ठाकरेंसाठी नवीन नाही. परंतु आता आदित्य ठाकरेंनीही आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत पूर्वी ज्या मेट्रो प्रकल्पाला सातत्याने विरोध केला त्याच मेट्रोने प्रवास करुन त्यांच्या दुटप्पीपणाचे दर्शन घडवले.
 
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून आता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. अशातच उबाठाचे आदित्य ठाकरे यांचा मेट्रोतून प्रवास करतानाचा एक व्हिडीओ एका वृत्तवाहिनीवर प्रसारित केला आहे. आदित्य ठाकरे यांनी एका प्रचारसभेसाठी जाताना कारऐवजी मेट्रोतून प्रवास केल्याची माहिती आहे. खरंतर मुंबईतील मेट्रो कारशेडला त्यांनी सातत्याने केलेला विरोध आणि आता अश्याप्रकारे मेट्रोतून केलेला प्रवास यातून त्यांच्या वागण्यातील विरोधाभास दिसून येतो.
 
वादग्रस्त ठरलेला मेट्रो ३ प्रकल्प
 
देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सुरु झालेला मेट्रो ३ प्रकल्प हा कारशेडच्या वादामुळे खूप गाजला होता. या प्रकल्पाला २०१४ मध्ये मान्यता मिळाली आणि प्रत्यक्षात प्रकल्पाचे कार्यादेश २०१६ मध्ये निघाल्यानंतर कामाला सुरूवात झाल्यापासून पाच वर्षात २०२१ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, आरेमध्ये कारशेड उभारण्यावरून शिवसेना म्हणजेच आताची उबाठा आणि काही पर्यावरणवादी संघटनांनी विरोध केला होता. त्यामुळेच २०१९ मध्ये राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या बांधकामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. मेट्रो-३ प्रकल्पाची अडीच वर्षांमधील 'काम बंद' स्थितीमुळे प्रकल्प खर्चात १० हजार २७० कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाची वाढ झाली.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
विकसित भारताचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कांदिवली पूर्व विधानसभेचे भाजपाचे कार्यकर्ते सज्ज आहेत! आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला विश्वास

विकसित भारताचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कांदिवली पूर्व विधानसभेचे भाजपाचे कार्यकर्ते सज्ज आहेत! आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला विश्वास

नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारताचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करणे हेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे ध्याय आहे असे उदगार कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी कांदिवली पूर्व विधानसभेत आयोजित विकसित भारत संकल्प सभेच्या उदघाटनाची वेळेस काढले. विकसित भारत संकल्प सभेस कांदिवली पूर्व विधानसभेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अत्यंत उत्साहात मोठ्यासंखेने उपस्थित होते. नरेंद्र मोदीजींच्या ११ वर्षांच्या दूरदर्शी नेतृत्वात भारत गरिबीवर यशस्वीपणे मात करतो आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121