मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या काही काळात अनेक सेलिब्रिटींची लग्न झाली काहींची मोडली. अशातच गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत आहेत. अर्थात दोघांनी याबद्दल अजूनही अधिकृतरित्या काहीही जाहिर केलं नाही. मात्र, गेल्या वर्षभरात अभिषेक आणि ऐश्वर्या कोणत्याही कार्यक्रमांना एकत्र हजर न राहिल्यामुळे लोकांचा संशय आता अधिकच वाढला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिषेक जलसावर अमिताभ बच्चन आणि जया बचच्न यांच्यासोबत न राहात असल्याची बातमी आली होती. त्याबद्दलच अभिषेकने एका मुलाखतीत पालकांबरोबर राहण्याविषयी आपले मत व्यक्त केले होते ते आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
२००९ मध्ये टीव्ही शो होस्ट ओप्रा विन्फ्री यांनी अभिषेक आणि ऐश्वर्या यांना एका मुलाखतीत विचारले होते की, तुम्ही लग्न झाल्यावरही आपल्या पालकांबरोबर राहता याबाबतीत तुमचा काय अनुभव आहे? या प्रश्नावर ऐश्वर्याने उत्तर दिले होते की, “आमच्यासाठी हे खूपच कॉमन आहे.” यावर अभिषेकने अधिक सविस्तर उत्तर देत म्हणाला, वडील अमिताभ बच्चन यांनीही आपल्या पालकांबरोबर राहण्याची परंपरा जपली आहे आणि तो स्वतःदेखील त्याच परंपरेचे पालन करत आहे.
ओप्रा यांनी पुढे विचारले की, “तुम्ही एकत्र जेवता का?” यावर अभिषेकने हसत सांगितले, “आईचा एक नियम आहे, जर आम्ही सगळे एकाच शहरात असू, तर दिवसातून एकदा तरी आम्ही सर्व जण एकत्र जेवतो.”
यानंतर ओप्रा यांनी बच्चन कुटुंबाच्या प्रतीक्षा बंगल्यात झालेल्या त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ दाखवण्यात आला. भारतीय लग्नातील भव्यता पाहून ओप्रा म्हणाले, “भारतीय लग्न खूपच भव्य असतात.” त्यावर अभिषेकने लग्नातील परंपरांबद्दल बोलताना म्हटले की, “भारतीय लग्न आठवडाभर किंवा कधी कधी दहा दिवस चालतात, ज्यामध्ये विविध विधी आणि परंपरा असतात.”