"महाराष्ट्राची सर्कस झालीये! कुणी विदुषकी चाळे करतं, तर कुणी..."; राज ठाकरेंची टीका

    07-Oct-2024
Total Views | 32
 
Raj Thackeray
 
पुणे : महाराष्ट्राची सर्कस झालीये. कुणी विदुषकी चाळे करतात तर कुणी मंत्रालयाच्या जाळ्यांवरून उड्या मारतात, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. सोमवारी राज ठाकरेंच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण पार पडले. यावेळी ते बोलत होते.
 
राज ठाकरे म्हणाले की, "आज महाराष्ट्राची राज्याची सर्कस झाली आहे. कुणी विदुषकी चाळे करतात तर कुणी मंत्रालयाच्या जाळ्यांवरून उड्या मारतात. महाराष्ट्राच्या राजकारणात कित्येक लोकं असे आहेत ज्यांना जाळ्यांशिवाय उड्या मारायला सांगितलं पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या प्रकारची भाषा वापरली जाते, तिथे त्यांना कान धरून जमिनीवर आणणं, शिकवणं आणि सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही त्या अधिकारवाणीने बोलू शकता."
 
हे वाचलंत का? -  मोठी बातमी! धनगर आरक्षणातला अडथळा दूर
 
"महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारं राज्य आहे. त्या महाराष्ट्राची राजकीय भाषा खूप खालच्या थराला गेली आहे आणि त्यांना समजावणारं कुणीच नाही. त्यामुळे साहित्यिकांनी ही जबाबदारी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी साहित्यीकांनी एक सामाजिक चळवळ उभी करणं गरजेचं आहे," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
बीडीडीचा ‘तो’ कार्यक्रम अन् मोतीलाल नगरच्या आशा पल्लवित! ५५६ कुटुंबांना वेळेत घराच्या किल्ल्या मिळाल्याने जनमताचा रेटा पुनर्विकासाकडे

बीडीडीचा ‘तो’ कार्यक्रम अन् मोतीलाल नगरच्या आशा पल्लवित! ५५६ कुटुंबांना वेळेत घराच्या किल्ल्या मिळाल्याने जनमताचा रेटा पुनर्विकासाकडे

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वरळीच्या बीडीडी चाळीतील ५५६ कुटुंबांना त्यांच्या नव्या घराच्या किल्ल्या सुपूर्द करण्यात आल्या. ही घटना मुंबईच्या अनेक प्रलंबित पुनर्विकास प्रकल्पांच्या आणि तेथील रहिवाशांच्या आशा पल्लवित करणारी ठरली असून गोरेगावातील मोतीलाल नगरसारख्या वसाहतींत जनमताचा रेटा आता मोठ्या प्रमाणात म्हाडाच्या, पर्यायाने पुनर्विकासाच्या बाजूने झुकताना दिसत आहे...

...म्हणून शिल्पाच्या घरी यंदा बाप्पा येणार नाही, २२ वर्षांच्या परंपरेत पडणार खंड

...म्हणून शिल्पाच्या घरी यंदा बाप्पा येणार नाही, २२ वर्षांच्या परंपरेत पडणार खंड

बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी वर्षानुवर्षे आपल्या घरात गणेशोत्सव साजरा करतात. सलमान खान, शिल्पा शेट्टी यांच्या घरातील गणेशाची विशेष चर्चा होते. २२ वर्षांपूर्वी शिल्पा शेट्टीने आपल्या घरी प्रथमच बाप्पा आणला होता. तेव्हापासून ती सातत्याने बाप्पाला घरी आणते. शिल्पाच्या घरी बाप्पा बसल्यावर ते फक्त सेलिब्रेशन नसतं, तर एक ग्लॅमरस फेस्टिव्हल असतो. तिच्या घरचा गणेशोत्सव म्हणजे लाईमलाईट, सेलिब्रिटी पाहूणे, डान्स, गाणी आणि एक वेगळाच जल्लोष. चाहते तिच्या घरासमोर दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र यावर्षी या प्रथेत खंड ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121