वृक्षांचे मानवी आयुष्यातील योगदान आणि महत्त्व हे काही नव्याने सांगायला नको. वृक्षांशिवाय मानव ही कल्पनासुद्धा करवत नाही. केवळ ऑक्सिजनच नाही, तर इतरही अनेक गोष्टी आपल्याला वृक्षांकडून मिळतात. वृक्षांच्या अशा बहुविध योगदानामुळे भारतीय संस्कृतीमध्ये त्यांना कुटुंबातील एखाद्या सदस्याप्रमाणे मानले जाते. आपले अनेक सण, व्रतवैकल्ङ्मे, पूजाअर्चा यांमध्ये त्यांना मानाचे स्थान आहे. अनेक लोककथांमधूनसुद्धा अशा वृक्षांचे महत्त्व अधोरेखित होत असल्याचे लक्षात येते. तर अशा या वृक्षांपैकी वटवर्गीय म्हणजे ’ Ficus ’ या वृक्षांविषयी आपण जाणून घेणार आहोत. वड, पिंपळ आणि रबर हे तीन महत्त्वाचे वृक्ष या कुटुंबाचे सदस्य आहेत.
’Ficus Benghalensis’ म्हणजे वड, ’Ficus Religosa’ म्हणजे पिंपळ, आणि ’ Ficus Elastica’ म्हणजे रबर यांशिवाय किमान ५० इतर वृक्ष या ङ्खॅमिलीचे सदस्य आहेत. अजूनही गावाला जाताना बर्याच रस्त्यांवर दुतर्फा वडाच्या झाडांची सावली असते. रस्ता रुंदीकरणात मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केली गेली, तरीसुद्धा अजूनही वडाची बरीच झाडे शिल्लक आहेत. अशा झाडांच्या कमानीतून जाणारा रस्ता सुरेख तर दिसतोच, परंतु विशेषतः उन्हाळ्यात त्यातून प्रवास अल्हाददायक असतो. इतरत्र अंगाची लाही लाही होत असताना येथे मात्र तापमान सुखावह असते.
’Ficus’ कुळातील महत्त्वाचा सदस्य म्हणजे ‘Ficus Benghalensis’ अर्थात वटवृक्ष त्याला ‘Ficus Indica’ म्हणूनही संबोधले जाते. सदाहरित वृक्षांमध्ये गणला जाणारा वटवृक्ष वेगाने वाढतो. ९०-१०० फुटांपर्यंत त्याची उंची असू शकते. भारतात सर्वत्र आढळणारा हा वृक्ष मध्यम ते जास्त पावसाच्या प्रदेशात आढळतो. असे असले तरीही कमी पाण्याच्या प्रदेशात, कमी पाण्यावरसुद्धा हा तग धरून राहतो. एरियल रूट्स म्हणजे मराठीमध्ये पारंब्यांसाठी वटवृक्ष प्रसिद्ध आहे. पूर्वी प्रचलित असलेला मात्र आता काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या ‘सूरपारंब्या’ हा खेळ या पारंब्यांवरच खेळला जातो. वड म्हटले की, मोठा आणि जाड बुंधा, तसेच मोठ्या घेराचा डेरेदार वृक्ष असे दृश्य डोळ्यांसमोर येते. भारतभरात असे अनेक मोठे वटवृक्ष आहेत. आंध्रङ्कधल्या अनंतपूर येथील कद्री लक्ष्मी नरसिंह मंदिराजवळील थीमम्मा मारीमानु, गुजरातमधील कबीरवड, तसेच ’ Great Indian Baniyan’ अर्थात बोटॅनिकल गार्डन, कोलकाता येथील वटवृक्ष हे सर्व सुमारे साडेचार ते पाच एकरांपेक्षाही जास्त भूभागावर पसरलेले वटवृक्ष आहेत. यांशिवाय मेहबूबनगर तेलंगण, बंगळुरु, आणि चौसष्ठ योगिनी मंदिर महाराजपूर, सागर, मध्य प्रदेश ङ्मेथील वटवृक्ष सुमारे ८००-एक हजार वर्षांपूर्वीचे आहेत. यांशिवाय महाराष्ट्रात पेमगिरी आणि तरोडा अमरावती येथेही प्राचीन आणि महाकाय असे वटवृक्ष आहेत. वटवृक्षाचे हिंदू धर्माशिवाय, जैन, बौद्ध धर्ङ्कांतसुद्धा उल्लेख आढळतात. भारतीय संस्कृतीमध्ये वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वटसावित्री पौर्णिमा हे त्याचेच एक द्योतक. वटवृक्षाला जीवन आणि पुनरुत्पादनाचे प्रतिक समजले जाते. आजही बर्याच ठिकाणी नवीन लग्न झालेल्या स्त्रीला संततीसाठी वटवृक्षाची पूजा करण्यास सांगितले जाते. आयुर्वेदात वटवृक्षाचे अनेक उपयोग सांगितलेले आहेत. अनेक स्त्रीरोगांवर तसेच गरोदरपणात गर्भाशयाच्या स्नायूंसाठी वटवृक्षाच्या सालीचा काढा गुणकारी आहे. अतिसार, दंतक्षय, दाह, त्वचारोग, मळमळ यांमध्ये वटवृक्षाच्या विविध भागांपासून बनवलेली औषधे वापरतात .
‘ ऊर्ध्वमूलं अधःशाखं अश्वत्थं प्राहुरअव्ययम् ’ म्हणून ज्या वृक्षाचा उल्लेख भगवान श्रीकृष्णाने केला, तो अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळ. ’प्रथम सर्व वृक्षणां(वृक्षाणाङ्क्)’ म्हणून याची महती सांगितली जाते. आधुनिक वनस्पतीशास्त्रानुसार ‘ Ficus Religosa ’ असे याचे नाव आहे. याला इंग्रजीत ’ Sacred Fig’ असेही संबोधतात. हिंदू धर्मात पिंपळ वृक्षाला पवित्र मानलं आहे. गौतम बुद्धांना याच वृक्षातळी ज्ञानप्राप्ती झाल्या कारणाने बौद्ध धर्मातसुद्धा पिंपळाला महत्त्व आहे. ब्रम्ह, विष्णू, महेश या त्रिमूर्तींचा अधिवास या वृक्षात आहे, असे मानले जाते. हृदयरोग, दमा, मधुमेह, बद्धकोष्ठ, इत्यादी विकारांमध्ये पिंपळापासून बनवलेली औषधे वापरतात. याच्या सालीचे चूर्ण पाण्यात उकळून घेतल्यास शक्तिवर्धक आणि रक्तशुद्धी करणारे आहे. अनेक त्वचारोगांमध्ये हा काढा उपयोगी आहे. वसंत ऋतूमध्ये येणारी ताजी फळे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते असे म्हणतात. हत्तीला याची पाने खूप आवडतात.
धार्मिक बाबतीत सांगायचे झाले तर, ऋग्वेद आणि वेदोत्तर वाङमयात याचे अनेक उल्लेख आढळतात. त्याला ‘वैबाध’ असेही एक संस्कृत नाव आहे. कारण तो इतर धार्मिक बाबतींत सांगायचे झाले तर ऋग्वेद आणि वेदोत्तर वाङ्ङ्कयात याचे अनेक उल्लेख आढळतात. त्याला ‘वैबाध’ असेही एक संस्कृत नाव आहे. कारण तो इतर झाडांच्या मुळांवर आक्रमण करून त्यांना जगू देत नाही. याशिवाय कठोपनिषदात याला ‘ब्रह्मवृक्ष’ असेही म्हटले आहे. सिंधू संस्कृतीमध्ये महिषमुंड नावाची एक देवता अश्वत्थ निवासी होती, असा उल्लेख आहे. श्रावणात अश्वत्थ पूजा करण्याचा प्रघात आहे. बंगालात वैशाख महिन्यात अश्वत्थपट नावाच एक व्रत स्त्रिया करतात. पिंपळाच्या पानांच्या सळसळीमुळे रात्री किंवा सायंकाळी भीती निर्माण करण्यात याचा हातभार आहे. यावर भुते आणि मुंजा यांचा वास असतो, असेही काही ठिकाणी सांगितले जाते. ’ Ficus Elastica ’ म्हणजे रबराचे झाड. हे साधारण ३०-४० मीटर अर्थात १००-१३० फुटांपर्यंत उंच वाढते आणि त्याचा बुंधा सुमारे सहा फुटांपर्यंत जाड असतो. भारताच्या काही भागांत लोकांनी रबराच्या मुळांपासून जिंगकीएन्ग नोंग्रीट नावाचे ’ङर्ळींळपस इीळवसशी’ म्हणजेच जैविक सेतू तयार केलेले आहेत. असे जैविक सेतू मेघालय या राज्यात आपल्याला दिसून येतात. एकंदरीतच, वृक्ष हे फक्त पर्यावरणाचा, निसर्गाचा भाग आहेत असे नाही, तर ते मानवी आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहेत. केवळ पर्यावरणीयच नव्हे, तर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिकदृष्ट्यादेखील ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत.
डॉ. मोहीत विजय रोजेकर
(लेखक ठाण्यातील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.)