रजनीकांत श्रीरामललाचरणी होणार नतमस्तक

सुपरस्टार रजनिकांत घेणार श्रीरामललाचे दर्शन

    19-Aug-2023
Total Views | 62
 
Rajani
 
 
 
मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांचा जेलर चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच नाही तर संपुर्ण हिंदी चित्रपटसृष्टीलाही मनोरंजनाची देणगी दिली आहे. या चित्रपटाचा जल्लोष रजनीकांत यांचे चाहते जगभरातून करत आहेत. एकीकडे चित्रपटाचे यश साजरे केले जात असताना दुसरीकडे रजनीकांत अयोध्येत जाऊन श्री रामाचे दर्शन घेणार आहेत. ‘एएनआय’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, “आज लखनौमध्ये असून उद्या म्हणजेच रविवार दि. २० ऑगस्ट रोजी अयोध्येत जाऊन श्री रामाचे दर्शन घेणार आहेत”.
 
 
 
 
रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट देशभरात १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. दरम्यान, 'जेलर' या चित्रपटाचे पहिले नाव Thalaivar १६९ असे होते. मात्र त्यानंतर हे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाच्या मेकर्सने नाव बदलून जेलर ठेवले कारण त्यांना रजनीकांत यांना हा चित्रपट ट्रीब्युट म्हणून द्यायचा होता. आत्तापर्यंत रजनीकांत यांनी अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना दिले असून त्यांची प्रमुख भूमिका असणारा जेलर हा चित्रपट त्यांचा १६९ वा चित्रपट आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121