चांद्रयान-३ पोहोचले चंद्राच्या आणखी जवळ! वाचा सविस्तर

    14-Aug-2023
Total Views | 146

Chandrayan-3


मुंबई :
भारताने पाठवलेले चांद्रयान-३ आता चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले असल्याची माहिती समोर आली आहे. आता चांद्रयान-३ ची चंद्रापासूनची कक्षा १५० किमी X १७७ किमी इतकी करण्यात आली आहे. श्रीहरिकोटा येथून १४ जुलै रोजी चांद्रयान-३ प्रक्षेपण करण्यात आले होते.
 
आकाशात झेपावलेल्या चांद्रयान-३ ला एक महिना पुर्ण झाला असून २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करणार आहे. चांद्रयान-३ ने ५ ऑगस्ट रोजी प्रथमच चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर तीन वेळा आपली कक्षा बदलून ते चंद्राच्या जवळ आले आहे. आता चांद्रयान-३ लंबवर्तुळाकार कक्षेतून वर्तुळाकार कक्षेत येऊ लागले आहे.
 
चांद्रयान-३ ची चंद्रापासूनची कक्षा १५० किमी X १७७ किमी इतकी करण्यात आली असून १६ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता आणखी एकदा कक्षा बदलली जाणार असल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे. त्यानंतर इस्रो चांद्रयान-३ चे प्रोपल्शन मॉड्यूल लँडरपासून वेगळे करेल आणि २३ ऑगस्ट रोजी लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
 
इस्रोला चांद्रयान-२ मोहिमेत सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आले होते. त्यामुळे आता चांद्रयान-३ कडे सर्वांचे लक्ष लागले असून ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राच्या भूमीवर उतरणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
अमर, अकबर, अँथनीची भन्नाट ट्रायो;

अमर, अकबर, अँथनीची भन्नाट ट्रायो; 'ऑल इज वेल' ची रंगतदार गोष्ट!

मैत्री ... ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही नकळत. त्याला वय, भाषा, धर्म, वर्ण कशाचीही मर्यादा नसते. अशाच एका मैत्रीची अनोखी गोष्ट वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. अमर, अकबर आणि अँथनी यांच्या मैत्रीची ही गोष्ट आहे. मनोरंजन आणि मस्तीचे जबरदस्त पॅकेज असलेल्या 'ऑल इज वेल' चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांचे आहे. बेळगावकर असलेल्या निर्माते अमोद मुचंडीकर,वाणी हालप्पनवर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सहनिर्मा..

कोंकण प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत भांडुप परिमंडलाचे

कोंकण प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत भांडुप परिमंडलाचे 'कुसुम मनोहर लेले' नाटकाने पटकाविले द्वितीय स्थान!

महावितरणच्या कोंकण प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत भांडुप परिमंडलाचे ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकाने द्वितीय स्थान पटकाविले आहे. तर रत्नागिरी चे नाटक आवर्त; हे नाटक विजेते ठरले आहे. २० जून २०२५ रोजी छत्रपति संभाजी राजे नाट्यमंदिर येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडली. महावितरणचे संचालक (मा सं) श्री. राजेंद्र पवार यांच्या शुभहस्ते नाट्य स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ, जळगावचे मुख्य अभियंता श्री. इब्राहीम मुलाणी, महाव्यवस्थापक (मा सं) श्री. राजेंद्र पांडे, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121