रांची : मोहरममध्ये झारखंडमधील पलामू येथून राष्ट्रध्वजाची छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. मोहरमच्या मिरवणुकीत तिरंग्यात अशोक चक्राऐवजी उर्दूमध्ये काहीतरी लिहून त्यात तलवारीचे चित्र छापण्यात आल्याचा आरोप आहे. काही वेळातच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आरोपींवर कारवाईची मागणी होत आहे. याप्रकरणी तपास करून कारवाई करण्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना दि. २८ जुलै रोजी घडली.
हे प्रकरण पलामू जिल्ह्यातील चैनपूर पोलिस स्टेशनचे आहे. डाल्टनगंज कल्याणपूर परिसरातील कांक्री मार्गावर दि.२८ जुलै रोजी मोहरमची मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीत डीजे वाजवत चालणाऱ्या काही लोकांच्या हातात तिरंगा झेंडेही होते. या ध्वजातील इतर सर्व काही राष्ट्रध्वजाप्रमाणेच होते पण अशोकचक्र मधूनच गायब होते. अशोक चक्राच्या जागी उर्दूमध्ये काही शब्द लिहिले होते आणि खाली तलवारीचे चित्र होते. आजूबाजूच्या लोकांनी या तिरंग्याचे फोटो काढले.
काही वेळातच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान, इस्लामी जाणकार मोहम्मद मौसुफ यांनी सांगितले की, ध्वजाच्या मध्यभागी मुस्लिमांचे कलमा तय्यब लिहिलेले आहे. हे 'ला इलाहा इल्लाल्लाहू मुहम्मदुरसुलुल्लाही' असे वाचले जाते. याचा हिंदीत अर्थ आहे, "अल्लाहशिवाय कोणीही देव नाही आणि हजरत मुहम्मद सल्लल्लाहो अलैहि वसल्लम हे अल्लाहचे दूत आहेत"
झारखंडचे भाजप नेते दीपक प्रकाश यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली. दि. २८ जुलै रोजी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, “पलामू जिल्ह्यातील मोहरम मिरवणुकीत राष्ट्रध्वजाची छेडछाड करणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, अशोक चक्र काढून तिरंगा ध्वजात उर्दू शब्द लिहिणे हे संविधानाच्या विरोधात आहे आणि राष्ट्राचा अपमान आहे.आपला राष्ट्रध्वज तिरंगा. अखेर हेमंत राजमध्ये अशा देशद्रोही शक्ती कशा प्रबळ होत आहेत? झारखंडच्या आणखी एका भाजप नेत्याने हा तुष्टीकरणाच्या राजकारणाचा धक्कादायक प्रकार असल्याचे म्हटले आहे.
या घटनेबाबत पलामूचे अतिरिक्त एसपी ऋषभ गर्ग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तपासासाठी पाठवण्यात आले, परंतु कोणतीही विशेष माहिती मिळू शकली नाही. यासोबतच फोटो पूर्णपणे स्पष्ट नसल्याची माहितीही त्यांनी दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुरावे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त एसपी सांगतात.