‘बाईपण भारी देवा’चे नामकरण कुणी केले?

    18-Jul-2023
Total Views | 76
 
baipan bhari deva (2)
 




मुंबई :
मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचा काळ खऱ्या अर्थान केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने दिला आहे. ३० जून रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत ३० कोटींच्या पुढे बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर या चित्रपटाने प्रेक्षकांच्या प्रतिसादाद्वारे त्यांची दाद मिळवतही कमाई केली. मुळात म्हणजे 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाचे नाव हे नव्हतेच. या चित्रपटाचे नाव 'मंगळागौर' असे ठेवले होते.
 
तर केदार शिंदेंच्या बाईपण भारी देवा या चित्रपटाचे सुरुवातीला नाव 'मंगळागौर' ठेवण्यात आले होते. मात्र, या नावावरुन चित्रपट कोणत्या तरी देवीचा किंवा धार्मिक कथेवर आधारित आहे की काय असा प्रेक्षकांचा समज होईल म्हणून या चित्रपटाचे नाव बदलण्याचा विचार करण्यात आला. ज्यावेळी चित्रपटासाठी बाई पण भारी देवा हे गाणे गीतकार वलय याने लिहिले त्यावेळी त्यात 'बाईपण भारी देवा' हे वाक्य लिहिले होते. त्यामुळे 'मंगळागौर' जर का नाव ठेवले तर ज्यांना मंगळागौर काय हेच माहीती नाही त्यांच्यापर्यंत हा चित्रपट पोहोचणार कसा? या प्रश्न उभा राहिल्यामुळे या चित्रपटाचे सह निर्माते अजित भुरे यांनी 'बाईपण भारी देवा' हे नाव चित्रपटासाठी पक्के केले.
 
‘बाईपण भारी देवा’ चित्रपट सहा बहिणींची कथा आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात चांगली कामगिरी करत आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121