मच्छर मारायला धमक्यांची गरज काय : नितेश राणे

    09-Jun-2023
Total Views | 528
 
raut
 
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली. यानंतर पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली, तर मच्छर मारायला धमक्यांची गरज काय असा टोला आ. नितेश राणेंनी संजय राऊतांना लगावला आहे. मोदी सरकारने ९ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने काही कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आले असून ते नागपूर विमानतळावर बोलत होते.
 
नितेश राणे म्हणाले की, "पवार साहेबांची सगळी काळजी घेण्याची जबाबदारी ही आमच्या सरकारची आहे. तुम्ही ज्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव घेत आहात, आता मच्छर मारण्यासाठी काही कोणाला धमकी देण्याची गरज नाही. पायाच्या खाली बुट हलवला तरी तो मरतो. त्याला काही धमकीचा विषय नाही."
 
"संजय राऊत विरोधात पत्राचाळ प्रकरण आहे, कोविड सेंटर घोटाळा प्रकरण आहे, एका महिलेने ही त्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. संजय राऊत यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. कोणत्या केसमध्ये आत जातील, हे येणाऱ्या काळात ठरेल. राऊतने मराठी लोकांची घरे लुटली होती, तो कुठला क्रांतिवीर नाही तर ४२० आहे." अश्या शब्दात नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीला वेसण घालण्याची गमावलेली संधी?

पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीला वेसण घालण्याची गमावलेली संधी?

इराणसारख्या आपल्या कट्टर शत्रूदेशाने अण्वस्त्रे विकसित करु नये, म्हणून आताच नाही तर गेल्या काही दशकांपासून इस्रायलने आक्रमकपणे रणनीती अवलंबली. आजही इस्रायलने तितक्याच त्वेषाने इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखण्यासाठी सर्व ताकद एकवटलेली दिसते. परंतु, दुर्दैवाने पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मिती प्रक्रियेला कायमस्वरुपी अंकुश लावण्यात भारताचे तत्कालीन काँग्रेस नेतृत्व अपयशी ठरले. पण, त्याच काँग्रेसी नेतृत्वाचे राजकीय उत्तराधिकारी असलेले राहुल गांधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दबावाखाली असल्याच्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121