मविआ चे गठन हा ‘पॉवर हंग्री जिहाद’ : आ. आशीष शेलार

"रिव्हर्जन" या धर्मांतर ते पुन्हा हिंदू धर्म प्रवेश याची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन

    19-Jun-2023
Total Views | 58
BJP Leader Ashish Shelar On MVA

ठाणे
: महाविकास आघाडीचे गठन झाले तेव्हाच पॉवर हंग्री जिहाद दिसुन आला.असा गौप्यस्फोट करून भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष, आमदार ऍड.आशिष शेलार यांनी या सत्ताभुकेल्या (पॉवरहंग्री) जिहादींना धडा शिकवण्यासाठी सजग राहा. असे आवाहन जनतेला केले. वंदे मातरम संघ आणि दीनदयाळ केंद्राच्या संयुक्त विद्यमाने धर्मांतराचे वास्तव आणि समान नागरी कायदा या विषयावर सोमवारी सायंकाळी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये विशेष कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केरळच्या ओ. श्रुती यांनी लिहिलेल्या रिव्हर्जन या इंग्लिश पुस्तकाचे प्रकाशन आ.शेलार यांच्याहस्ते झाले.

देशावरील वैचारिक हल्ले, सामाजिक भेद निर्माण करणारी प्रवृत्ती, आणि राष्ट्रीय एकात्मतेला दिले जाणारे आव्हान याबाबतचे सत्य उलगडण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर द केरला स्टोरीचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन, ओ.श्रुती, विशाली शेट्टी, ज्येष्ठ विधिज्ञ अंजली हेळेकर,ऍड. संदीप लेले, समन्वयक माधव नानिवडेकर आणि दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भा. वा. दाते, कार्यवाह मकरंद मुळे,सचिव सचिन केदारी,सीए कल्पना राईलकर तर प्रेक्षकांमध्ये माजी खा.संजीव नाईक केरला स्टोरीचे लेखक सुर्यपाल, ठाणे भाजप महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे, मा. नगरसेविका प्रतिभा मढवी,डॉ.राजेश मढवी, संघचालक अरविंद जोशी, टीजेएसबीचे शरद गांगल आदी उपस्थित होते. यावेळी पितांबरी समुहाचे परिक्षित प्रभुदेसाई यांनी ५० हजारांची देणगी देऊन या उपक्रमाला सहकार्य केल्याने त्यांचा आ.शेलार यांच्याहस्ते सन्मान कार्यक्रमात करण्यात आला.

यावेळी बोलताना आ. आशिष शेलार यांनी ओ.श्रुती यांनी धर्मांतरणाबाबत मांडलेल्या आपबीतीतुन समाजासमोर प्रश्न ठेवुन विचार करायला लावल्याचे नमुद केले. केवळ धर्मांतरण नाही तर हे हिंदु आणि राष्ट्र यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. सर्वसाधारणतः लव्ह जिहाद, ईलेक्ट्रॉनिक जिहाद, सर्व्हीस जिहाद आणि पॉवर हंग्री जिहाद या चार प्रकारे सुरु असलेला जिहाद आ.शेलार यांनी सोदाहरण स्पष्ट केला. जगण्यातील खरा मार्ग हिंदु पद्धतीत असुन संविधानातही पंथनिरपेक्ष बना असे लिहिले आहे. हिंदु धर्म प्राचीन व सोशिक आहे. फ्रिडम ऑफ रिलिजन तसेच फ्रिडम ऑफ मुव्हमेंट असले तरी या सर्व कलमांना 'पण' आहे. धर्मातरण नाही तर हे मतमतांतरण करताना मतांसाठी तुष्टीकरण सुरु असुन त्यातुनच आंतकवाद जन्म घेत आहे. महाविकास आघाडीची बांधणी झाली तेव्हाच पॉवर जिहाद दिसुन आल्याचा गौप्यस्फोट करून आ.शेलार यांनी, मविआ सरकार बनताना समर्थन देण्यास कॉग्रेस शेवटपर्यत तयार नव्हती. तेव्हा कुणीतरी अहमद पटेल, कुठले तरी चर्च अथवा पीएफआयमधुन फतवा निघतो, उद्याच्या व्यवस्थेसाठी आता उद्धवजींना समर्थन द्या. अन्यथा काँग्रेसचे समर्थनाचे पत्र उद्धवजींना जाण्याचा मुद्दाच काय? त्यानंतर सोनिया गांधीनी काँग्रेसचे समर्थन जाहिर केले. काझी औरंगजेबासोबत जाणाऱ्या तसेच स्वा.सावरकरांचे धडे वगळणाऱ्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे मैत्री करतात हा षडयंत्र व कटाचा भाग असल्याचा भंडाफोड केला.आज हा पॉवर जिहाद गंभीर वळणावर आहे, घरात शिरून जिहाद केला जातोय तेव्हा सजग राहुन या सत्ताभुकेल्या जिहादींना धडा शिकवण्याचे आवाहन आ. शेलार यांनी केले.

ज्येष्ठ विधिज्ञ अंजली हेळेकर यांनी समान नागरी कायद्यावर बोलताना, १९५१ साली एका खटल्यात समान नागरी कायद्याची गरज व्यक्त करण्यात आली. त्यानंतर, अनेकदा विविध प्रकरणातुन तसेच खटल्यांच्या निर्णयावरून महिला व पुरुषांना समानतेची वागणुक तसेच समान नागरी कायद्याची आवश्यक्ता असल्याचे तज्ञानी सांगितल्याचे नमुद केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मकरंद मुळे यांनी तर संदीप लेले यांनी आभार प्रदर्शन करताना हिंदु समाजाने संस्कृतीचे पालन करण्याचे आवाहन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने जनादेश दिला आहे. तेव्हा त्यांनी आपल्या जाहिरनाम्यात दिलेले ३७० कलम हटवण्याचे तसेच समान नागरी कायदा लागु करण्याचे वचन पुर्ण केल्यास विरोधकांचे आक्षेप का ? असा परखड सवाल केला. सुदीप्तो सेन यांनी, केरला स्टोरी हे केवळ निमित्त असुन काही लोक १०० कोटी कमविण्यासाठी चित्रपट बनवतात पण आम्ही १०० कोटींना जागवण्यासाठी चित्रपट बनवला आहे.तेव्हा, देशाला इस्लामिक टेररीझमची प्रयोगशाळा बनु द्यायची की नाही हे तुमच्या हाती आहे. असे आवाहन उपस्थितांना केले.

केरळ येथील विशाली शेट्टी ज्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारून आता केरळ येथे मुली आणि महिलांचे समुपदेशन करत आहेत. त्यानी आपला अनुभव सांगताना, आयटी क्षेत्रात काम करीत असताना मुस्लीम सहकारी हिंदु धर्मात असे का .. तसे का ? असे प्रश्न विचारून भंडावुन सोडत, मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करून इस्लामची थोरवी बिंबवण्याचा प्रयत्न करीत. यातुन ब्रेन वॉश करून धर्मांतरण केले. अखेर नोकरी सोडुन सनातन धर्माचे आचरण करणाऱ्या आशा विद्या समाजम संस्थेसाठी झोकुन दिले असुन याद्वारे हिंदु समाजाला जागे करण्याचे काम करीत असल्याचे सांगितले.

पेशाने शिक्षिका असलेल्या रिव्हर्जन या पुस्तकाच्या लेखिका ओ.श्रुती यांनी, भाषेची अडचण असतानाही हिंदी भाषेत संवाद साधला. आर्थिक गुंतवणुक करून केरला स्टोरीच्या माध्यमातुन धर्मांतराचा हा गंभीर विषय समाजासमोर मांडल्याबदल निर्माते व दिग्दशकाचे आभार व्यक्त करून धर्मांतरण नव्हे तर या मतमतारणाला कुटुंबाला आई - वडीलाना दोषी न धरता या सिस्टीमला दोषी मानत असल्याचे नमुद केले. रमजान दिवशी एका मैत्रिणीने आणलेल्या पुस्तकापासुन याची सुरुवात झाल्याचे सांगुन हिंदु धर्म देवळे व देवदेवतांबद्दल इतके देव का ? अशी चेष्टा करून अशा धर्मात का जन्म घेतलास, असे हिणवत असत. एकच देव आहे, इनटॉलरंट गॉड असे सांगुन ब्रेनवॉश केला गेला.माहिती नाही मी कुठे असते, पाकिस्तानात हिरा मंझील हे वेश्यालय आहे. चित्रपटात दाखवले त्यापेक्षाही भयाण परिस्थिती केरळमध्ये असुन तेथुन ३२ हजार पेक्षा अधिक जणी आयएसआयच्या संपर्कात गेल्या आहेत. माझ्याकडे पासपोर्ट असता तर कदाचित मीदेखील इस्लामिक देशात पोहचली असते. पाच वर्ष इस्लामचा अनुभव घेतला नमाज पढणे, कुराण वाचणे पण आशा विद्या समाजम संस्थेमुळे अडिच तासातच मला यातुन बाहेर काढले. चार कारणामुळे धर्मातरण होते. एक सनातन धर्म शिकवला जात नाही, योग्य चरित्र इतिहास शिकवला जाण गरजेचे, सोशल मिडियात रिल्समध्ये गुरफटणे आणि एकत्रित कुटुंबपद्धत कालबाह्य होतेय, प्रत्येक धर्माबाबत कम्पॅरेटीव्ह रिलिजस व्हावे. हे मोठे मिशन आहे. तेव्हा, स्वामी विवेकानंद, शंकराचार्य यांच्या प्रमाणे धर्मप्रचारक बना. असे आवाहन त्यांनी केले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121