संकष्टी चतुर्थीला नांदगावच्या सिद्धिविनायक मंदिरात भक्तांची गर्दी

    09-Apr-2023
Total Views | 89
Crowd of devotees at Siddhivinayak Temple of Nandgaon on Sankashti Chaturthi

मुरुड-जंजिरा
: तीन दिवसांच्या सलग सुट्टीमुळे तसेच दहावी , बारावीच्या परीक्षा संपल्यामुळे आणि मुंबई,ठाणे, पुण्यासारख्या शहरातील वाढलेल्या तापमानामतून थोडासा दिलासा मिळावा या हेतूने मुरुड तालुक्यातील विविध ठिकाणच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली असून त्यापैकी अनेक पर्यटकांनी संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटे पासूनच नांदगावच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.स्थानिक ग्रामस्थ भक्त देखील मोठया प्रमाणांत दिसून आले.

गुढीपाडव्याच्या दिवशी मंदिरातील साल बदललेले सालकर गुरुजी विनायक पुरुषोत्तम जोशी यांच्या सह सेवा मंडळाचे पुजारी महेश गोविंदराव जोशी यांनी पहाटे श्री सिद्धिविनायकाची पहाटे शोडषोपचारे पुजा अर्चा केली.त्यानंतर भाविकांनी देवदर्शनार्थ मंदिरात गर्दी केली.यात स्थानिकांसह पर्यटकांचाही समावेश होता.

संकष्टी चतुर्थी निमित्त मंदिराच्या परिसरात हार, फुले, दुर्वा, नारळ,पेढे ,बर्फी,केळी व उपवासाच्या अन्य पदार्थांच्या विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले होते. सायंकाळी स्थानिक भजनी बुवांनी सुस्वर भजने सादर केली तर सामुहिक आरतीलाही भाविकांची गर्दी झाली होती.
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121