बाळासाहेबांच्या पुण्याईवर किती दिवस जगणार ?

प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल

    11-Apr-2023
Total Views |
pravin-darekar-on-balasaheb-thackeray

मुंबई : ''हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे कार्य, त्यांनी हिंदुत्व आणि बाबरी मशीद प्रकरणात दिलेले योगदान यासाठी आम्ही कायमच बाळासाहेबांचा आदर करत आलेलो आहोत आणि करत राहू. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुठल्याही नेत्याने काय करावे हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे त्यावर ठाकरेंनी बोलू नये. चंद्रकांत दादांनी केलेल्या विधानाचा विपर्यास करून उद्धव ठाकरे राजकारण करत असून केवळ इतरांच्या टीकेवर प्रत्युत्तर देत धन्यता मानत आहेत.

इतकी वर्षे बाळासाहेबांच्या नावाने राजकारण करण्यात उद्धव ठाकरेंनी धन्यता मानली. बाबरी प्रकरणात बाळासाहेबांच्या भूमिकेचे देशाने स्वागत केलेले आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे कुठे होते हे त्यांनी सांगावे. वडिलांच्या जीवावर जगण्याची एक वेळ असते, त्यामुळे उद्धव ठाकरे अजून किती दिवस बाळासाहेबांच्या जीवावर राजकरण करून जगणार ?'' असा खोचक सवाल भाजप नेते आमदार प्रविण दरेकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

ठाकरे नाव टिकवण्यासाठीच शिंदेंचे प्रयत्न

''ठाकरेंचे नाव पुसण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी प्रयत्न करत आहेत असा आरोप ठाकरे गट कायम करत आला आहे. मात्र, कोन्ग्रेस आणि राष्ट्रवादी सारख्या आपल्या कडवट राजकीय शत्रूंशी सत्तेसाठी युती करून हिंदुत्वाचा विचार बासनात गुंडाळून बाळासाहेबांचे विचार आणि ठाकरेंचे नाव बुडवण्याचे काम तुम्हीच करत होतात. मात्र एकनाथ शिंदे यांनी हा उठाव करून ठाकरे हे नाव आणि हिंदुत्वाचा विचार कायम ठेवण्यासाठी शिंदे हेच प्रयत्न करत आहेत,'' या शब्दांत त्यांनी ठाकरेंना सुनावले आहे.

तुमच्या कोट्यांचा राज्याला उबग आलाय !

ठाकरेंकडून भाजपवर केल्या जाणार्या टीकेवर दरेकर म्हणाले की, ''भाजप ही भरकटलेली जनता पार्टी आहे किंवा भ्रष्टाचारी जनता पार्टी आहे अशा प्रकारच्या या कोट्यांचा जनतेला उबग आला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे आपल्या पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आलेय त्यावर उद्धव ठाकरे यांनी विचार करावा.पक्ष रसातळाला गेला, चिन्ह गेले, नाव गेले. बाळासाहेबांचे विचारही एकनाथ शिंदे सोबत घेऊन गेले. उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसाही सांभाळू शकले नाहीत. ठाकरे नाव टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी हा पवित्रा घेतला आहे. हिंदुत्वाचे विचार बासनात गुंडाळून तुम्ही राष्ट्रवादी, काँग्रेससोबत गेलात. त्यामुळेच उद्धव ठाकरेच ठाकरे नाव मिटवत होते, असा टोलाही आ. दरेकर यांनी लगावला.

''उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे काम करावे. आमच्या पक्षात काय करायचे हे आमचे नेतृत्व व पक्षश्रेष्टी समजून घेण्यात सक्षम आहेत. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला,'' असेही दरेकर म्हणाले.




अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121