सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती नाहीच!

    30-Dec-2023
Total Views | 182
sunil-kedar-s-sentence-be-stayed-and-get-bail-court-s-decision

मुंबई : नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना सुनावलेल्या पाच वर्षांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेला स्थगिती देण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला. हे प्रकरण सर्वसामान्यांच्या पैशांशी संबंधित आहे. रिझर्व्ह बँक, सेबी आणि सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे कारवाई झाल्याने आता त्यांना जामीन दिल्यास किंवा शिक्षेला स्थगिती दिल्यास लोकांमध्ये चुकीचा समज जाईल. त्यामुळे त्यांची याचिका फेटाळण्यात येत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने शनिवार, दि. ३० डिसेंबर रोजी नोंदवले.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५० कोटींच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळ्यात माजी मंत्री तथा काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना २२ डिसेंबर रोजी पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ च्या कलम ८(३) नुसार त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यामुळे या शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी केदार यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. परंतु, सरकारी वकिलांनी त्याला विरोध केला.

या घोटाळ्यात २० वर्षांपूर्वी १५३ कोटी रुपयांची रक्कम गुंतलेली आहे. हजारो शेतकऱ्यांचा तो पैसा होता आणि घोटाळ्यामुळे नंतरच्या काळात हजारो शेतकरी अडचणीत आले. त्यामुळे या प्रकरणातील पुरावे लक्षात घेता आरोपींना जामीन देणे चुकीचे ठरेल, असा युक्तिवाद सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी केला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा व सत्र न्यायालयाने केदार यांना दिलासा देण्यास नकार दिला.
अग्रलेख
जरुर वाचा
ऑपरेशन सिंदूरनंतर आता

ऑपरेशन सिंदूरनंतर आता 'ऑपरेशन पुशबॅक'ने उडवली बांगलादेशची झोप!

भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवत पाकिस्तानातील दहशतवादास चांगलाच धडा शिकवला. या अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक तळही उध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने बांगलादेशी घुसखोरांविरोधात ऑपरेशन पुशबॅक सुरु केले आहे. बांगलादेशी-रोहिंग्यांच्या देशातील वाढत्या प्रमाणावरून उचलण्यात आलेले हे पाऊल आहे. या कारवाईअंतर्गत, तात्काळ कारवाई करून, घुसखोरांना निवडकपणे त्यांच्या देशात परत पाठवले जात आहे. आतापर्यंत सुमारे एक हजारहून अधिक बांगलादेशींना परत पाठवण्यात आले आहे. इस्लामिक कट्टरपंथींना मात्र या कारवाईमुळे ..

गांधीजींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही तर...; शशी थरूर यांनी पाकिस्तानला ठणकावलं!

"गांधीजींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही तर..."; शशी थरूर यांनी पाकिस्तानला ठणकावलं!

(Shashi Tharoor warns Pakistan) 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत सरकारने दहशतवादाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळं पाठवली आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळातील एका शिष्टमंडळाचे प्रमुख असलेले शशी थरूर यांनी महात्मा गांधींच्या वाक्याचा उल्लेख करत पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. "आता दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस संपले. इथून पुढे दहशतवादी हल्ला झाल्यास महात्मा गांधींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ,"असे थरूर यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121