‘उबाठा’ने मुंबईकरांशी केली १ लाख कोटींची बेईमानी

- मंत्री आशिष शेलार यांचा गंभीर आरोप; पालिका आयुक्तांना भेटून श्वेतपत्रिकेची केली मागणी

    28-May-2025
Total Views | 8
‘उबाठा’ने मुंबईकरांशी केली १ लाख कोटींची बेईमानी
 
मुंबई, गेल्या २० वर्षांत मुंबई महापालिकेने नालेसफाई, मिठी नदी, पूर परिस्थिती नियंत्रण, नाले बांधकाम, ब्रिमस्टोवॅड यासाठी सुमारे १ लाख कोटी खर्च केले, तरीही मुंबईतील परिस्थिती का बदलली नाही? याचे उत्तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी द्यावे. ही उबाठाने मुंबईकरांशी केलेली १ लाख कोटींची बेईमानी आहे, असा गंभीर आरोप मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी बुधवार, दि. २८ मे रोजी केला.

मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत बुधवारी आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्ठमंडळाने महापालिका मुख्यालयात जाऊन पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. ब्रिमस्टोवॅडसह मागील २० वर्षांच्या काळात मुंबईत खर्च झालेल्या १ लाख कोटीच्या कामांची श्वेतपत्रिका काढा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. महापालिकेच्या २० वर्षांमधील ८० लाख कोटींच्या बजेटमधील ४० टक्के विकास कामे धरली आणि केवळ १० टक्के रक्कम मिठी नदी, ब्रिमस्टोवॅड प्रकल्पासाठी खर्च झाले, असे मानले तरी २० वर्षांत मुंबईकरांचे १ लाख कोटी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी खर्च केले. त्याचा हिशेब त्यांनी मुंबईकरांना द्यावा आणि त्यानंतर मागच्या तीन वर्षांचा हिशेब आम्हाला विचारावा, असे मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले.

या शिष्टमंडळात माजी गटनेते प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा, माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, कमलेश यादव, रिटा मकवाना, प्रकाश गंगाधरे, आशा मराठे, हर्षिता नार्वेकर, रोहिदास लोखंडे आदींचा समावेश होता. या बैठकीत आशिष शेलार म्हणाले की, ब्रिमस्टोवॅड प्रकल्प आजपर्यंत का पूर्ण झाला नाही? त्यासाठी सन २०१७ पर्यंत किती निधी खर्च झाला? २५ ते ५० मि.मी पाऊस झाला, तर ही यंत्रणा उपयोगात येणार आहे. यापेक्षा जास्त पाऊस झाला तर काय करणार? याचे उत्तर पालिका आयुक्तांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

मिठी नदीतून किती गाळ काढला? तो कुठे टाकला? त्यासाठी किती निधी खर्च झाला? याची माहिती मुंबईकरांना द्या. कारण मिठी नदी ही भ्रष्टाचाराचे कुरण झाले असून मृत व्यक्तीच्या नावे करार केले गेले. ज्या जागेत गाळ टाकला असे सांगितले जाते, त्या ग्रामपंचायती असे काही घडले नसल्याचे सांगत आहेत. मग पालिका मुंबईकरांसमोर सत्य मांडणार आहे की नाही? झाडांच्या फांद्या आणि दरड हे दोन्ही विषय अत्यंत तातडीने करायचे असल्याने याबाबत आयुक्तांनी तात्काळ निर्णय घ्यावा. अन्यथा या पावसाळ्यात दुर्घटना घडली, तर आम्ही थेट आयुक्तांना जबाबदार धरु, असेही मंत्री शेलार यांनी सांगितले.

मर्जीतील कंत्राटदारांसाठी नियम बदलले

- दोन दिवस पाऊस पडला, तेव्हा पाणी साचलेल्या ठिकाणी पंप उपलब्ध नव्हते. ते उपलब्ध करून द्यावे. ब्रिटानिया पंपिंगस्टेशनचा प्रयोग फसला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत पाणी तुंबले. या पंपिंग स्टेशनची निविदा आपल्या मर्जितील ‘ए ई डब्ल्यू’ या कंत्राटदार कंपनीला मिळावी, म्हणून त्यावेळी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी अटींमध्ये कोणते बदल केले? त्याचा परिणाम कामावर कसा झाला? पाणी उपसा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणारे निकष कंत्राटदार कंपनीसाठी कसे बदलले गेले, याचे वास्तव मुंबईकरांसमोर आयुक्तांनी मांडावे, अशी मागणीही यावेळी मंत्री शेलार यांनी केली.

- कोस्टल रोडसाठी भराव टाकण्यात आला, त्यावेळी तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या बगलबच्च्यांना काम देण्यासाठी निविदेतील निकष बाजूला ठेवले. निकृष्ट दर्जाची माती, दगड, खडी या भरावात वापरली जात आहे, याकडे भाजपाने त्यावेळी लक्ष वेधले होते. याबाबतची सत्याता मुंबईकरांसमोर मांडावी. याबाबत आयुक्तांकडे लेखी उत्तर मागण्यात आले आहे.

आयुक्त काय म्हणाले?

शिष्टमंडळाशी बोलताना आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले आहे की, पाऊस १५ दिवस आधीच आल्याने नियोजन कोलमडले. नालेसफाईची कामे पूर्ण झालेली नाहीत. तसेच मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम ही ५५ टक्के पेक्षा जास्त होऊ शकलेले नाही. त्याची विविध कारणे आहेत. पण यापुढे ८ दिवसांत ही कामे पूर्ण करण्यात येतील. ज्या ठिकाणी पाणी तुंबते त्या ठिकाणी पंप बसवण्याचे काम २४ तासांत पूर्ण करण्यात येईल. आवश्यकता वाटेल तिथे पंपांची संख्या वाढवण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितल्याची माहिती मंत्री शेलार यांनी दिली. तर या सगळ्या कामांवर पुढील आठ दिवसात भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक लक्ष ठेवून राहतील, असेही ते म्हणाले.





अग्रलेख
जरुर वाचा
एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं  काय घडलं?

एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं काय घडलं?

(Air India flights) इस्रायलने शुक्रवारी दि.१३ जून रोजी इराणची राजधानी तेहरानसह वेगवेगळ्या भागांमध्ये हवाई हल्ला केला, ज्यामुळे मध्य-पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इराणने तातडीने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आता कोणत्याही देशाची विमानं इराणच्या हवाई क्षेत्रामधून उड्डाण करू शकणार नाहीत. याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसला आहे. इराणने त्यांची हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाच्या १६ विमानांचा मार्ग बदलावा लागला आहे. यापैकी काही विमानं मागे वळवावी लागली. ..

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडियाच्या ए-१४१ अहमदाबाद-लंडन या विमानाचा उड्डाणाच्या काही कालावधीनंतर अपघात झाला. यात एकूण २४१ प्रवासी आणि २४ विद्यार्थी व डॉक्टर, असे मिळून २६५ जणांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील खुशबू राजपुरोहित यांचाही या मृतांमध्ये सामावेश होता. खुशबूचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तिचे पती मयूर पुरोहित हे लंडनमध्ये डॉक्टर म्हणून रुग्णसेवा बजावतात. खुशबू त्यांना भेटण्यासाठी लंडनला निघाली होती. ही तिची पतीसोबतची पहिली भेट होती, कारण विवाहानंतर लगेच मयूर लंडनला रवाना झाले होते. त्यामुळे खुशबूच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121