मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. तसेच, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे महागाई भत्त्यात आणखी २ टक्क्यांची भर पडणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारने महागाई भत्त्यामध्ये २ टक्क्यांची वाढ करत कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. काही महिन्यापूर्वी सरकारने महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केली होती. तसेच, आता पुन्हा एकदा डीए वाढीसंदर्भात निर्णय घेणार आहे. त्यामुळे महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ करत आता एकूण ४४ टक्के होणार आहे.