ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एसटीची १०℅ भाडेवाढ

    04-Nov-2023
Total Views | 36
Maharashtra State Transport Corporation

मुंबई :
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीच्या हंगामात भाडेवाढ जाहीर केली आहे. या हंगामी भाडेवाढीद्वारे दिवाळीनिमित्ताने होणाऱ्या गर्दीचा फायदा उठविण्यासाठी एसटी महामंडळाकडून सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्क्यांची भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ही ही भाडेवाढ ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे.

दरम्यान, राज्यातील एसटी महामंडळाच्या हंगामी भाडेवाढ करण्याच्या निर्णयामुळे पर्यटनानिमित्त प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना या दरवाढीचा चांगलाच फटका बसणार आहे. तसेच, दरवर्षी एसटी महामंडळ महसूलवाढीसाठी सुट्यांच्या दिवसात परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ करीत असते.

तसेच, या हंगामी भाडेवाढ मुदतीनंतर मूळ तिकीट दराप्रमाणे तिकीट आकारणी सुरू होईल. तसेच, ज्या प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षण केले आहे, त्यांच्या तिकीटाची उर्वरित फरकाची रक्कम प्रत्यक्ष प्रवास करताना वाहकाकडे भरावी लागणार आहे, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!; भारताचे पाकवर टीकास्त्र

"ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!"; भारताचे पाकवर टीकास्त्र

(India on Trump-Munir meet) पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांची ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांऐवजी लष्करप्रमुख ट्रम्प यांना भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवर आता भारताने प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे...

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121