ठाण्यातील धर्मादाय रुग्णालये प्रशासनाच्या सुविधांवर मारतात डल्ला - मनसेचा आरोप

    26-Oct-2023
Total Views | 52

MNS

ठाणे :
कळवा रूग्णालय आणि जिल्हा रूग्णालयावरील ताण पहाता प्रशासनाने ठाण्यातील धर्मादाय रूग्णालयाची सुविधा रूग्णांसाठी खुली करणे गरजेचे आहे. मात्र तसे न होता ठाण्यातील धर्मादाय नावाखाली रूग्णालये सरकारच्या सुविधांवर डल्ला मारत असुन उपचारासाठी रूग्ण मात्र वणवण भटकत असल्याची परिस्थिती ठाण्यात दिसून येत आहे. पालिका प्रशासनाने ठाण्यातील धर्मादायमध्येही निर्धन घटकांतील रूग्णांना उपचारासाठी खाटा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
 
ठाणे शहरातील बेथनी, कौशल्या आणि महावीर जैन रूग्णालय ही धर्मादायच्या अखत्यारित येतात. निर्धन घटकातील लोकांना वैद्यकिय सुविधा मोफत मिळावी तसेच दुर्बल घटकातील लोकांसाठी माफक दरात वैद्यकिय सुविधा मिळावी या अनुषंगाने धर्मादाय अधिनियम १९५० ची स्थापना करण्यात आली. या अधिनियमा अंतर्गत सवलतीच्या दरात रुग्णसेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी धर्मादाय रुग्णालयाची आहे.

मात्र ठाण्यातील धर्मादाय रूग्णालयात खाटा उपलब्ध नसल्याचे सांगत या घटकातील रूग्णांना उपचार नाकारले जात असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. शिवाय नियम डावलत अशा रूग्णांकडून डिपॉझिटही घेतली जात आहे. शिवाय अ‍ॅब्युलन्सची सुविधा मोफत देणे बंधनकारक असतानाही ठाण्यातील सर्व धर्मदाय रूग्णालयातील अ‍ॅब्युलन्सच्या सेवेसाठी अवाजवी पैसे वसुल केले जात असल्याचा आरोप महिंद्रकर यांनी केला आहे.यावर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली नाही, तर मनसे येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन करेल. असा इशाराही देण्यात आला आहे.

ठाण्यातील धर्मादाय रूग्णालयाचा कारभार हा निष्क्रिय पद्धतीने सुरू असून निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांसाठी किती खाटा उपलब्ध आहेत याची माहितीही दिली जात नाही. यासाठी असलेली वेबसाईटही अपडेट नसुन दुर्बल गटातील लोकांसाठी असलेल्या उत्पन्नाच्या अटी संदर्भात देखील रुग्णालय परिसरामध्ये कुठेही नोंद दिसून येत नाही. याचबरोबर शासनाच्या वतीने नियमितपणे उत्पन्नाच्या विषयी काढलेल्या आदेशाचे पालन धर्मादाय रुग्णालया मार्फत होत नसल्याचे आक्षेप मनसेने नोंदवले आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा पालघर जिल्हयात शुभारंभ, या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत.

प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा पालघर जिल्हयात शुभारंभ, या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा शुभारंभ 16 जून रोजी पालघर जिल्हयात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार डॉ. हेमंत सवरा, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121