फुलपाखरांचे ‘रंगीत` जीवनचक्र

    22-Aug-2022
Total Views | 118
Butterfly
 
 
 
मनमोकळं वावरणे हे सुख-शांतीचे द्योतक आहे, तसंच भरपूर फुलपाखरं हेदेखील जंगलातील सुदृढ वनसंपदेचं द्योतक होय! फुलपाखरू हे केवळ स्वच्छंदी-मनस्वीपणाचेच प्रतीक नसून, पर्यावरणातील जैव आणि अन्नसाखळीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याच फुलपाखरांच्या जीवानाचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
असं म्हणतात की, ज्या घरातून लेकी-सुनांच्या हसण्या-खिदळण्याचे आवाज येत असतात, त्या घरांध्ये सुख-सृद्धी, शांतता सदैव नांदत असते. तसंच ज्या ठिकाणी भरपूर प्राणात फुलपाखरं आढळून येतात, त्या ठिकाणची वनसंपदा उत्त आणि विपुल प्रमाणात असते. म्हणजेच काय? तर लेकीसुनांचे `मनमोकळे` वावरणे, हे सुखशांतीचे द्योतक, तसंच भरपूरफुलपाखरं हेदेखील जंगलातील सुदृढ वनसंपदेचं द्योतक होय! फुलपाखरू हे केवळ स्वच्छंदी- मनस्वीपणाचेच प्रतीक नसून, पर्यावरणातील जैव आणि अन्नसाखळीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मंडळी, फुलपाखरांचं आणि वनस्पतींचा फार जवळचा संबंध आहे. फुलपाखरांना त्यांच्या संगोपन आणि वाढीकरिता दोन प्रकारच्या वनस्पतींची गरज असते.
 
एक म्हणजे `खाद्य वनस्पती` आणि दुसरी म्हणजे `नेक्टर वनस्पती.` ज्या वनस्पतींवर फुलपाखरांची अंडी-अळी-कोष हा जीवनक्र घडून येतो ती म्हणजे खाद्य वनस्पती होय. उदा. कढीपत्ता, बांबू, आपटा, ऐन, अर्जुन वगैरे. ज्या पुष्प वनस्पतींच्या फुलांमधील ‘मधुरस` पिण्याकरिता फुलपाखरांची `झुंबड` उडते, अशा झाडांना त्या फुलपाखरांची `नेक्टर` वनस्पती असे संबोधले जाते. उदा. रिठा, शेवगा, हळदीकुंकू, सप्तपर्णी, भोकर, भंडीरा वगैरे. या दोन्ही प्रकारच्या वनस्पती फुलपाखरांकरिता अत्यंत आवश्यक समजल्या जातात. साहजिकच जिकडे या वनस्पती विपुल प्रमाणात आहेत, तिकडे जास्त प्रमाणात फुलपाखरं आढळून येतात.
 
 
 
Butterfly१
 
 
मंडळी, आठवून बघा सुमारे 40-50 वर्षांपूर्वीचा काळ... असा काळ की, ज्या काळी घराच्या आजूबाजूच्या परिसरातील `मेंदी` वाटून स्त्रिया आपापले हात-पाय रंगवून घरातले लग्नकार्य साजरे करीत, तो हा काळ !  माझ्या एका वैद्य त्रािने `झाडाचं लग्न लावणारा भटजी` असं फुलपाखरांचं वर्णन केलंय. ते म्हणतात, आपल्या मातीतल्या सगळ्याच `झाडांची लग्न`ही फुलपाखरं लावतात. फुलपाखरं अनेक झाडांना त्यांच्या फुलांमधील मधुरस पिण्याच्या उद्देशाने भेट देत असतात. त्यावेळी सपुष्प वनस्पतीमधील परागीभवन घडून येतं आणि त्यामुळ फुलझाडांची संख्या वाढते. हे आपण लहानपणापासून शाळेत शिकत आलोय. अन्नग्रहण करण्यासाठी अनेक प्रजातींची फुलपाखरं, फुलांवर अवलंबून असतात. फुलं हा त्यांच्याकरिता एक मोठा निसर्गस्रोतच.
 
 

Butterfly२ 
 
 
फुलपाखरू फुलांवर हळुवारपणे बसते. तसेच रस प्राशन करताना, सतत ते त्याच्या पंखांची फडफड करीत असते. ही फडफड फुलाचा व स्वतःचा तोल साधण्यासाठी होत असते. जर का पंखांची फडफड केली नाही, तर फुलपाखराच्या वजनांनी फुले तुटण्याची, त्यांच्या पाकळ्या गळून जाण्याची दाट शक्यता असते. म्हणून मधुरस पितानादेखील ते फुलाची काळजी घेत असतात. या वागणुकीने, नैसर्गिक स्रोतांचा अत्यंत काळजीपूर्वक आणि काटेकोरपणे वापर करण्याची एक `मोठी शिकवण` फुलपाखरू आपल्याला देऊन जाते. अगदी पूर्वीपासून फुलपाखरांच्या स्थलांतरातून मानवाला अनेक प्रकारचे संदेश मिळत असतात, नव्हे फुलपाखरांचे स्थलांतर हेच मुळी पर्यावरणीय बदलातील संकेताचे प्रतीक समजले जायचे.
 
 
एखाद्या विशिष्ट ठिकाणी खाद्य वनस्पती संपायला आली की, त्या वनस्पतींवर अवलंबूनअसणारी फुलपाखरं त्या ठिकाणाहून दुसरीकडे जायला निघतात. हेच फुलपाखरांचे स्थलांतर होय. एका ठिकाणच्या वनस्पतीची कमतरता निर्माण झाली, हा संकेत फुलपाखरांमार्फत दिला जातो. तसेच ऋतूबदलाबाबतदेखील म्हणता येईल. फुलपाखरू हे पावसाळ्याच्या आधी पश्चिम घाट ते पूर्व घाट असे स्थलांतर करीत असतात.
(क्रमशः)
दिवाकर ठोंबरे
अग्रलेख
जरुर वाचा
क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे नवी मुंबईसाठी पुनर्विकास प्रदर्शनाचे आयोजन

क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे नवी मुंबईसाठी पुनर्विकास प्रदर्शनाचे आयोजन

नवी मुंबई आणि रायगड भागातील गृहनिर्माण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या पहिल्याच उपक्रमात चाळीस वर्षांखालील तरुण रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना, क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे सिडको Exhibition सेंटर रविवार, २९ जून २०२५ रोजी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 8:00 वाजेपर्यंत मेगा पुनर्विकास प्रदर्शन योजले आहे. आज नवी मुंबईतील हॉटेल ताज विवांता येथे रिअल इस्टेट उद्योगातील वरिष्ठ नेते, क्रेडाई एमसीएचआय युथचे पदाधिकारी आणि माध्यमांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली...

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांना न्याय

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांना न्याय

ज्या शिल्प निदेशकांनी ५ वर्षांपेक्षा जास्त काळ विभागामध्ये कार्य केले आहे, त्यांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात यावे असे लेखी निर्देश कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांना दिले. माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी तासिका निदेशकांना नियमित करण्याबाबत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांना पत्राद्वारे विनंती केली होती. यानंतर मंत्री श्री. लोढा यांनी पत्राची तातडीने दखल घेत, संबंधित अधिकाऱ्यांना सकारात्मक चर्चा करून योग्य कार्यवाही..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121