हृतिक आणि सैफचा 'विक्रमवेध' वादात? निर्मात्यांनी दिले स्पष्टीकरण

    04-Jul-2022
Total Views | 48
 
 
 
vikramvedha
 
 
 
 
 
मुंबई : सध्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांमध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा 'विक्रम वेध' हा एक चित्रपट आहे. चाहते या चित्रपटाची वाट पाहत असतानाच आता एका नव्या वादाने तोंड वर केले आहे. माध्यमांतील सूत्रानुसार असे समजत आहे की, हृतिकने उत्तर प्रदेशात चित्रपटाच्या चित्रीकरणास नकार दिला. आणि त्याच्या सांगण्यानुसार टीमने यूएईमध्ये भारतीय राज्याचे प्रतिबिंब दिसणारे नेपथ्य तयार केले होते. रिलायन्स एंटरटेन्मेंट हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाच्या सहनिर्मात्यांनी एक प्रसिद्धीपत्रक जाहिर करून या वादाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
 
 
 
 
तर निर्माता कंपनीने आबूधाबीत चित्रीकरणाविषयी माहिती देत हे वृत्त दिशाभूल करणारे आहे असे म्हटले आहे. ते ट्विटरवर प्रसिद्धीपत्रक शेअर करत म्हणतात, की विक्रम वेधच्या चित्रीकरण स्थळाविषयी बऱ्याच दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवल्या जात आहेत. आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की विक्रम वेधचे बहुतेक चित्रकरणाचा मोठा भाग लखनौत पूर्ण झाला आहे. चित्रपटाचा काही भाग संयुक्त अरब इमिरट्समध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ पासून चित्रीकरण करण्यात आले. हे फक्त एकच स्थळ होते जिथे मुलभूत सुविधा जसे की बायो बबल यासारख्या सोयी सुविधा होत्या.
 
 
 
 
त्यामुळे आरोग्य आणि प्रोटोकाॅलसाठी आम्ही याची निवड केली. त्यामुळे या वस्तुस्थितीकडे चुकीच्या पद्धतीने पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्जनशील लोकांकडून आलेल्या सल्ल्याचा आम्हाला आनंदच होईल, त्यामुळे आम्ही स्वागतच करु! निर्मिती आणि पैशाबाबतचा निर्णय केंद्रीय पद्धतीने घेतले जातात, असे रिलायन्सकडून सांगण्यात आले आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121