सत्ता असताना अजितदादांनीही उंटावरुन शेळ्याच हाकल्या!

    29-Jul-2022
Total Views |

y

 

 
मुंबई : विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी वरती मागून घोडे नाचले या म्हणी प्रमाणे विधार्भातील पूरपरिस्थिती ओसरल्यावर विदर्भाचा दौरा केला. फडणवीस-शिंदे सरकारने पूरपरिस्थितीची पाहणी आणि नुकसानभरपाई जाहीर केल्यानंतर अजित पवारांना आपण विरोधीपक्ष नेता असल्याची आठवण झाली. मग काय विरोधाला विरोध दर्शवण्यासाठी दादांनी फडणवीस-शिंदे सरकारला लक्ष केले.
 
 
माध्यमांनी देखील अजित पवारांच्या तथ्यहीन टीकेचा चांगलाच समाचार घेत, महाविकास आघाडीच्या काळात कोकण आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी आपत्तीजनक परिस्थिती उद्भवली असताना तुम्ही झोपला होतात का असा प्रश्न अजित पवारांना विचारला. सध्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्ष नेतेपदी असताना कोरोना काळात  पूरपरिस्थिती उद्भवल्याने महाराष्ट्र पिंजून काढला होता. तेव्हा अजित पवार पुणे जिल्हा सोडला तर कुठेही फारसे फिरकले नाहीत,असाही टोला अनेकांनी पवारांना लगावला.
 
 
सध्या विदर्भ दौऱ्यावर असलेल्या पवारांनी "मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या राखणाऱ्यांना काय कळणार की शेतात काय अडचणी आहेत? इथे फिल्डवर उतरूनच बघावं लागतं, अशी फडणवीस-शिंदे सरकारवर टीका केली पण त्यांचा रोख बहुदा माजी मुख्यमंत्र्यांवर असावा, कारण वर्क फ्रोम होमची सुरुवात ठाकरे सरकारच्या काळात झाली होती.
 
 
कोरोनाकाळात कोकणाची निसर्गचक्री वादळाने धूळधान केली, तसेच चिपळूणला पुराने झोडपले तेंव्हा अजित पवार कुठे होते? रायगड येथे नुकसान भरपाई पाहणीच्या दौऱ्याकडे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यामंत्री अजित पवारांनी पाठ दाखवल्यानेच शरद पवारांना जावे लागले होते का? असा प्रश्न आता अजित पवारांना सोशल मिडीयावर विचारला जातोय.
 
 


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121