जीएसटीवाढीचा शॉक

    30-Jun-2022
Total Views | 58
 
gst
 
 
 
 

नवी दिल्ली : देशातील वाढत्या महागाईच्या झळांनी सर्वसामान्य जनता पोळली जात असताना आत त्यात अजून जीएसटी दरवाढीची भर पडली आहे. येत्या १८ जुलै पासून ही दरवाढ लागू करण्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेत घेण्यात आला. या परिषदेत पाकीट बंद आणि लेबल असलेल्या वस्तूंवरच्या जीएसटी दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व पदार्थांवर आता ५ टक्के जीएसटी लागू होणार आहे
 
 
 
या वस्तूंमध्ये पाकिटबंद मासे, दही, पनीर, मध, सोयाबीन, मटार यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. यांव्यतिरिक्त बँकांकडून काढल्या धनादेश सेवा, टेट्रा पॅकमधले पदार्थ यांवर १८ टक्के, ऍटलास, नकाशा यांसारख्या वस्तूंवर १२ टक्के जीएसटी लागू होणार आहे. याच बैठकीत गोव्याच्या अर्थमंत्र्यांनी कॅसिनो, घोड्यांच्या शर्यती, ऑनलाईन गेमिंग यांच्यावरील करांचा विचार करावा अशी मागणी केल्यामुळे यांच्यावरचा प्रस्ताव मंत्रिगटाकडे पुनर्विचारासाठी पाठवण्यात येणार आहे. या दरवाढीने आता देशात काही जीवनावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये वाढ होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढलेली महागाईपासून भारतीय अर्थव्यवस्था अलिप्त राहू शकत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून ही दरवाढ झाली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121