देशातील सर्वात मोठ्या कर्जघोटाळा करणाऱ्या कंपनीवर ईडीची कारवाई

एबीजी शिपयार्ड कंपनीच्या मालमत्तांवर ईडीची धाड

    27-Apr-2022
Total Views | 65
 
abg
 
 
 
 
 
मुंबई: देशातील सर्वात मोठा कर्ज घोटाळा करणाऱ्या एबीजी शिपयार्ड कंपनीच्या मुंबई, पुणे, सुरत येथील एकुण २६ कार्यालयांवर ईडीने मंगळवारी धाडी घातल्या. एबीजी कंपनीवर २००५ ते २०१२ या कालावधीत घेतलेले २२ हजार ८४२ कोटींचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. या कंपनीने हे पैसे १०० बनावट कंपन्यांच्या मार्फत त्या पैश्यांचा गैरव्यवहार उघड झाला आहे.
 
 
देशातील सर्वात मोठी जहाज बांधणी कंपनी असलेल्या एबीजी शिपयार्ड या कंपनीच्या संचालकांनी या कर्ज मिळालेले पैसे बनावट कंपन्यांच्या मार्फत देश - विदेशात फिरवून त्याद्वारे मालमत्ता खरेदी केल्या आहेत. या कंपनीच्या संचालकांविरोधात सीबीआयने ७ फेब्रुवारी रोजी एफआयआर दाखल केला होता त्याआधारेच ही ईडीने कारवाई सुरु केली आहे. या कंपनीचे प्रवर्तक आणि संचालक ऋषी अगरवाल हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121