या पुढचा अमरावतीतला खासदार शिवसेनेचा असेल : संजय राऊत

बंटी-बबलीचं हिंदूत्व बोगस : राऊत | कमेंट करा तुमचं मत

    23-Apr-2022
Total Views | 129
Sanjay Raut




नागपूर :
आमची ताकद काय आहे ते राणा दाम्पत्याला कळेल. या पुढचा आमदार आणि खासदार अमरावतीतून शिवसेनेचा निवडून येईल, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा पठणाची घोषणा केली.

राणा कुटूंबियांच्या आंदोलनावर प्रतिक्रीया देण्यासाठी त्यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राऊत यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली. अमरावती जिल्ह्यात आपलीच हवा आहे. शिवसेनेचा तिथे बालेकिल्ला आहे. पुढच्या वेळेस तिथली जागा निवडणूका जिंकून दाखवू असा इशारा त्यांनी दिला.


खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांचा बंटी आणि बबली, असा उल्लेख करत हिंदुत्वाच्या नावाखाली बोगसपणा करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. हनुमान चालीसा मंदिरात वाचावे, आपल्या घरी वाचावी त्यासाठी मातोश्रीची जागा निवडावी हे कुणाचे कारस्थान आहे. त्यांचा हिंदूत्वाशी संबंध काय आहे. श्रीरामाचे नाव घेण्याला यांचा विरोध होता. हिंदूत्व हा शब्द उच्चारायला त्यांना लाज वाटत होती.


तेव्हा त्यांनी हिंदूत्व आम्हाला शिकवू नये. हे जे दीड शहाणे आहेत. त्यांनी कृपा करुन शिवसेनेच्या वाटेले जाऊ नये. मातोश्रीची छेडछाड करू नका, शिवसेनेच्या संयमाची परीक्षा पाहू नका. हिंदूत्वाच्या नावाने आज तुमच्या विषाला उकळी फुटलेली आहे. ते दाबण्याची धमक शिवसेनेत आहेत. मी आजही नागपूरातच आहे. उद्धवजींनी आम्हाला नागपूरातच रहायला सांगितले आहे., असेही ते म्हणाले.


राष्ट्रपती राजवट कशी लावली जाते हे आम्हाला देखील माहिती आहे. आम्हाला कायदा कळते, आम्हाला घटना कळते. जातीचे बोगस प्रमाणपत्र दाखल करुन जी व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढते. ज्या बोगस प्रमाणपत्राला उच्च न्यायालयात दाद मिळाली नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयात गेलेल्यांनी आम्हाला हिंदूत्व शिकवू नये. या महाराष्ट्रामध्ये ढोंग पाप आणि खोटेपणाला थारा नाही. ही शिवसेना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचीच आहे.


मातोश्रीची रेकी करण्याचा हा प्रयत्न झाला. शिवसैनिक कंटाळले. शिवसैनिक चाल करुन गेले. सत्ता असेल नसेल आम्हाला परवा नाही परंतू, पुन्हा असा प्रकार झाला तर पुन्हा एकदा शिवसैनिक चाल करुन जातील. महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करायचे अराजक निर्माण करायचे. शिखंडींना पुढे करुन आमच्यावर हल्ले करायचे हे असेच चालणार नाही.


महाभारत नव्याने घडवण्याची ताकद शिवसेनेची सुरू आहे. हे सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करेल. बोगस प्रमाणपत्रात निवडून आलेले खासदार आहेत. त्यांना माझे आव्हान आहे की, पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून या, मी पाहतो, असा इशारा त्यांनी दिला. अशी बरीच आव्हानं आम्ही स्वीकारली आणि उलटवून लावली, असेही राऊत म्हणाले. 



    







अग्रलेख
जरुर वाचा
राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीने राज्यातील थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या १ लाख ३५ हजार ३७१ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली. यामुळे राज्यात सुमारे १ लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले...

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

घोटाळ्यात सापडलेल्या ‘न्यू इंडिया को‑ऑपरेटिव्ह बँके’चे विलीनीकरण सारस्वत बँकेमध्ये येत्या ऑगस्ट‑सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या प्रक्रियेत कोणत्याही गुंतवणूकदाराचे नुकसान होऊ देणार नाही. ठाकूर म्हणाले, “सर्व गुंतवणूकदारांना कोणत्याही रकमेचे नुकसान न होता मुलभूत रक्कम मिळेल.” सध्याच्या परिस्थितीत, ज्यांना त्यांच्या खात्यातून एकावेळी २५ हजार पेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही, त्यांना विलीनीकरणानंतर त्यांच्या पूर्ण रकमेची खात्री दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121