कोरोनाने निधन झालेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना नोकरी द्या

भाजप शिक्षक आघाडीची मागणी

    06-Mar-2022
Total Views | 86
                 
teachers
 
 
मुंबई: कोरोना महामारीच्या काळात अनेक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी कित्येक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे कोरोनामुळे निधन झाले.कोरोनामुळे निधन झालेल्या अशा कुटुंबातील किमान एका वारसालाअनुकंपा तत्त्वावर  शासकीय सेवेत सामावून घ्यावे. जेणेकरून त्यांच्या कुटुंबीयांना जगण्याचा आधार मिळेल.
 
शासनाकडून स्थगित असलेली अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया तातडीने सुरू करून कोरोना काळात निधन पावलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या वारसांना तातडीने शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी करणारे निवेदन भाजप शिक्षक आघाडीचे मुंबई अध्यक्ष डॉ. राजू धोंडिबा बंडगर यांनी मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना पाठवले. यावेळी भाजप शिक्षक आघाडी मुंबईचे सोपान मोरे, विरेंद्र नेवरेकर, संदीप खेडकर, उमेश जागडे, महेश खाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121