कांदिवलीत घर कोसळून बालकाचा मृत्यू

दोन महिला जखमी

    27-Mar-2022
Total Views | 84


kandivali
 
मुंबई: कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा येथे घर कोसळून एका मुलाचा मृत्यू झाला आणि दोन महिला जखमी झाल्या आहेत. ड्रेनेज लाईनचे काम सुरू असताना तळमजला अधिक एकमजली घराचा मोठा भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत नौशाद अली हा बालक गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि शाहीदुनिसा रैन, हसीना शहा या महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेतील मृत मुलाच्या कुटुंबियांना महापालिकेने १० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी आणि जखमींनाही मोफत उपचार देऊन काही प्रमाणात आर्थिक मदत करावी, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक कमलेश यादव यांनी केली आहे.
 
कांदिवलीतील शिंपोली टॉवरजवळ रस्त्याचे काम सुरु असताना ड्रेनेज लाईनचेही काम सुरू होते. तेथील कंत्राटदाराने रस्त्याची कामे करण्याअगोदर ड्रेनेज लाईनचे काम सुरु केले. तेथील एका चाळीतील तळमजला अधिक एकमजली घराजवळ त्याने अंदाजे तीन - चार फूट खोदकाम केले. परंतू, ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण होण्याआधीच एक मजली घराचा मोठा भाग शनिवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी दुर्घटनाग्रस्त घराजवळ धाव घेऊन आणि दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकानेही तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य हाती घेतले. स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि वॉर्ड अधिकारी या दुर्घटनेची अधिक चौकशी करीत आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीने राज्यातील थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या १ लाख ३५ हजार ३७१ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली. यामुळे राज्यात सुमारे १ लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले...

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

घोटाळ्यात सापडलेल्या ‘न्यू इंडिया को‑ऑपरेटिव्ह बँके’चे विलीनीकरण सारस्वत बँकेमध्ये येत्या ऑगस्ट‑सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या प्रक्रियेत कोणत्याही गुंतवणूकदाराचे नुकसान होऊ देणार नाही. ठाकूर म्हणाले, “सर्व गुंतवणूकदारांना कोणत्याही रकमेचे नुकसान न होता मुलभूत रक्कम मिळेल.” सध्याच्या परिस्थितीत, ज्यांना त्यांच्या खात्यातून एकावेळी २५ हजार पेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही, त्यांना विलीनीकरणानंतर त्यांच्या पूर्ण रकमेची खात्री दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121