कळमेश्वर सिटी सर्व्हे घोटाळ्याप्रकरणी महसूल मंत्र्यांचे पुर्नतपासणीचे आदेश

आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांना यश

    23-Mar-2022
Total Views | 86

bawankhule 
 
 
नागपूर : नगर भूमापनद्वारे कळमेश्वर-ब्राह्मणी शहरात २०१२-१३ सालातील सिटी सर्व्हेत घोटाळा झाल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती. याप्रकरणी कळमेश्वर येथील उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने घेतलेल्या शिबिरात ९० अर्ज प्राप्त झाले असून, त्यांच्या पुनर्तपासणीचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
 
सन २०१२-१३ साली नागपूरसह राज्यातील ६१ नगर परिषदांचे सिटी सर्व्हे करण्यात आले. यात कळमेश्वर ब्राम्हणी नगर परिषदेचाही समावेश आहे. परंतु नगरपरिषदेला विश्वासात न घेता नगर भूमापन व भूमी अभिलेख कार्यालयाने खाजगी संस्थेव्दारे सर्व्हे केल्याची तक्रार स्थानिकांची होती. महत्वाचे म्हणजे सर्व्हे करणाऱ्या खाजगी संस्थेने कागदपत्रांची पुर्तता व दस्तऐवजांची शहानिशा न करता अत्यंत चुकीचा सर्व्हे केला. मालमत्तांच्या नोंदणी चुकीच्या आणि आखीव पत्रिकेत मोठा घोळ असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. या प्रकरणातील तथ्य जाणून घेण्याचा आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रयत्न केला.
 
यावेळी, सन २०१२-१३ साली राज्याच्या ६१ नगर परिषदांमध्ये झालेल्या सिटी सर्व्हेत कळमेश्वर-ब्राह्मणी शहराचा समावेश असून, येथे ५ हजार ४२० मालमत्तांचे भूमापन झाले असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली. कंत्राट देण्यात आलेल्या खाजगी कंपनीने १ ऑगस्ट २०१३ रोजी भूमापन पूर्ण केले. हे काम करण्यापूर्वी मालमत्ता धारकांना नोटीस देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. तरीही नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता शिबीरच्या माध्यमातून आलेल्या अर्जदारांच्या मालमत्तांचे कागदपत्रे तपासून तीन महिन्यात कार्यवाही करणार असल्याचे यावेळी बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतराची सवलत नाही - बाबासाहेबांच्या आरक्षणाचा अपमान थांबवाच!

धर्मांतराची सवलत नाही - बाबासाहेबांच्या आरक्षणाचा अपमान थांबवाच!

धर्मांतराच्या जाळ्यात नुकताच ऋतुजा राजगेसारख्या गर्भवती, सुशिक्षित युवतीचा दुर्दैवी अंत झाला. तिच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा छळ करण्यात आला. या घटनेनंतर आता तरी आरक्षणाचा लाभ घेणार्‍या समाजाला जागं होणं अत्यावश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आरक्षण व्यवस्था धर्मांतरासाठी नव्हे, तर सामाजिक न्यायासाठी होती. शतकानुशतके शोषित राहिलेल्या घटकांना सन्मानाने उभं राहता यावं म्हणून होती. मात्र, आज जिहादी आणि ख्रिस्ती मिशनरी वृत्तीने प्रेरित झालेल्या धर्मांतरितांकडून, या व्यवस्थेचा दुरुपयोग ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121