ब्रिटीशांनी करून ठेवलेले कायदे बदलण्याची गरज ; राज्यपाल

    14-Mar-2022
Total Views | 66

koshyari
 
 
मुंबई : भारत स्वातंत्र होऊन ७५ वर्षे उलटून गेली तरीही ब्रिटीशांनी करून ठेवलेले काही कायदे आजही अस्तित्वात आहेत. याच कालबाह्य झालेल्या कायद्यांचा आढाव घेऊन हे कायदे बदलण्याची गरज असल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हंटले आहे.मुंबईतील विले-पार्ले येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 
 
 

विधी व न्याय हा अतिशय व्यापक विषय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकांपलीकडे जाऊन अभ्यास केला पाहिजे. न्यायशास्त्र व तर्कशास्त्र या विषयांवर प्राचीन काळात भारतात विपुल चिंतन झाले असून विधी विद्यार्थ्यांनी आपल्या देशाच्या न्यायशास्त्राचा देखील अभ्यास केला पाहिजे असंही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले.


koshyari 
 
 
शिवाय आपल्या देशात इंग्रजी भाषेचे ज्ञान फार कमी लोकांना आहे. त्यामुळे विधी शिक्षण प्रादेशिक भाषेत उपलब्ध झाले पाहिजे तसेच विधी विद्यार्थ्यांनी व वकिलांनी मातृभाषेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे जेणेकरून सामान्य माणसाला कायदे समजणे शक्य होईल, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
 
 
मुंबईतील विले पार्ले येथील मा. कानबाई विद्याधाम या संस्थेने सुरु केलेल्या अधिया विधी महाविद्यालयाचे उद्घाटन १३ मार्च रोजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता देखील उपस्थितीत होते. 
 
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121