पालिकेकडूनचं आदित्य ठाकरेंचे 'स्वप्नभंग!'

तानसा जलवाहिनीच्या बाजूने तयार होणाऱ्या सायकल ट्रॅकचे काम रखडले...

    21-Feb-2022
Total Views | 97

aditya cycle track
 
 
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा जलवाहिनीच्या दोन्ही बाजूंनी ३९ किलोमीटरचा सायकल ट्रॅक बनविणे हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. मात्र सध्या या प्रकल्पाचे काम रखडले असल्याचे पहायला मिळत आहे. आत्तापर्यंत या प्रकल्पावर १२५ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून हा प्रकल्प मार्च २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही या प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे पालिकाच ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट रखडवत असल्याचे चित्र दिसत आहे.
 
मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा जलवाहिनी ही प्रामुख्याने मुलुंड ते धारावी आणि घाटकोपर ते शीव या भागांमध्ये पसरलेली आहे. या जलवाहिनीच्या दोन्ही बाजूला १० मीटर पर्यंत असणारे अनाधिकृत बांधकाम हटविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते. ही जलवाहिनी पालिकेच्या नऊ प्रशासकीय विभांगातून जात असल्याने न्यायालयाच्या आदेशानंतर मुलुंड, भांडूप, सहार, वाकोला, हुसेन टेकडी, खार पूर्व, माहीम, धारावी, घाटकोपर,कुर्ला पूर्व, आणिक डेपो या विभांगात कारवाई करण्यात आली. ही कारवाई झाल्यानंतर पालिकेने पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी दोन्ही बाजूंना संरक्षण भिंती देखील उभारल्या आहेत.
 
अतिक्रमण हटवल्यानंतर मोकळ्या जागेचा नागरीकांना उपयोग व्हावा म्हणून पालिकेने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात 'हरितवारी जलतीरी' हा महत्तवकांक्षी प्रकल्प हाती घेतला. २०१८ साली सुरू झालेला हा प्रकल्प २०२१ मध्ये पुर्ण होणे अपेक्षित होते. मात्र मुदत पूर्ण होऊन एक वर्ष उलटून गेले तरी अद्याप हा प्रकल्प अपूर्णच आहे. या प्रकल्पावर आत्तापर्यंत १२५ कोटी कोटी खर्च केले असून आणखी ४५ कोटींची तरतूद सध्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

राज्याच्या अनेक भागात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्या बसेसच्या झालेल्या दूरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एस.टी. बसेस बाबत वारंवार नागरिक व लोकप्रतिनिधी यांचेकडून शासनाकडे निवेदन वा तक्रार करुनही नवीन बस खरेदी व बस स्थानकामध्ये सुधारणा करण्याबाबत कोणतीही प्रभावी उपाययोजना व त्याची अंमलबजावणी का करण्यात येत नाही, असा सवाल राज्याच्या विविध भागातील आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसेसची कमतरता भरुन काढण्यासाठी रा.प. महामंड..

राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यातील पहिल्या सहा जिल्ह्यांमध्ये आयटीआय संस्थाचे आधुनिकीकरण दरवर्षी ५०००-७००० तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग,बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन,एम.डी रुरल ग्रुप यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधील विदेशी पतसंस्था सामंजस्य करारातंर्गत १२० कोटी रूपयांची गुंतवणुक करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर आणि नाशिक मधील सहा निवडक आयटीआय..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121