मातोश्रीच्या अंगणातून भाजपचा एल्गार

आजपासून मुंबई भाजप करणार "जागर मुंबईचा"

    05-Nov-2022
Total Views | 76
 

जागर मुंबईचा 
 
 
मुंबई : काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचे दिसून येत आहे. मुंबईकरांना आकर्षित करणाऱ्या कार्यक्रमांची आखणी करून मतदारांचे लक्ष वेधण्याचा भाजपचा प्रयत्न काही अंशी यशस्वी होत असल्याचे वरळीतील दीपावली महोत्सव आणि काळाचौकीतील मराठी दांडिया महोत्सवाने दाखवून दिले होते. त्याचाच पुढील भाग म्हणजे मुंबई भाजपच्या 'जागर मुंबईचा' अभियानाचा शुभारंभ ठाकरेंच्या बांदऱ्यातून होणार आहे. रविवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईत भाजपकडून सातत्याने आयोजित करण्यात येत असलेले कार्यक्रम आणि त्याच्या माध्यमातून मुंबईकरांना आकर्षित करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांमधून शिवसेनेला धूळ चारल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असे भाजपच्या कार्यशैलीवरून दिसते आहे. त्यातच उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीच्या अंगणातच एका नव्या अभियानाचा शुभारंभ करण्यात येत असून या माध्यमातून भाजप या कार्यक्रमातून महापालिका निवडणुकीसाठीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. 'जागर मुंबईचा' या नव्या अभियानाचा मुंबई भाजपतर्फे शुभारंभ करण्यात येणार असून पालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


भ्रष्टाचाराची पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही

'मुंबईची शांतता धोक्यात आणून मुंबई महापालिका निवडणूकीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. एका विशिष्ट वर्गाचे तुष्टीकरण केले जात असून त्याला रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली "जागर मुंबईचा" या अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. रविवार, दि. ६ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या जागर यात्रेचे प्रमुख आमदार अतुल भातकळकर असून हे अभिमान राजकीय भ्रष्टाचाराची पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही,' असा विश्वास मुंबई भाजपचे अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.
वांद्रे पूर्वच्या गव्हर्नमेंट कॉलनीतील पी.डब्ल्यू.डी मैदानात आज संध्याकाळी ६ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खा. पुनम महाजन आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार हे प्रमुख वक्ते म्हणून या सभेत संबोधित करणार आहेत. आमदार अँड पराग अळवणी यांच्यासह मुंबईचे पदाधिकारी यावेळी उपस्थितीत राहणार असल्याची माहिती भाजपतर्फे देण्यात आली आहे. 'पोलखोल' अभियानाप्रमाणे हे अभियान देखील सातत्याने सुरु ठेवण्यात येणार असून त्याची पुढील सभा लगेचच सोमवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी अंधेरी पूर्वेत आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबईकरांनी अभियानात सहभागी व्हावे

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतांसाठी तुष्टीकरण.. महापालिकेतील भ्रष्टाचार आणि परिवारवाद तसेच औरंगजेबी स्वप्न पाहणाऱ्यांची जी भलती "उठा"ठेव सुरु आहे त्या विरोधात भाजपाने मुंबईकरांसाठी झंझावाती जागर सुरु केला आहे. हा जागर आम्ही सुरू करत असून या मुंबईच्या जागराला वांद्रे पूर्व येथूच सुरुवात होणार. भविष्यकाळात होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी मुंबईकरांनी या अभियानात सहभागी व्हावे कारण हा जागर मुंबईकरांनी मुंबईकरांसाठीच सुरु केलेला आहे.'

- आ. आशिष शेलार, अध्यक्ष, मुंबई भाजप



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121