वरळीत आदित्य ठाकरेंचा पराभव होणार?

    03-Oct-2022
Total Views | 44




वरळीतील मच्छीमार बांधवांनी आपला कौल एकनाथ शिंदे गटाला दिला आहे. जोगेश्वरी, वरळी, अंधेरी, येथील विविध भागांतून पाच हजार शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली हा पाठिंबा दिला आहे. कोळी बांधवांच्या या पाठिंब्यामुळे शिंदे गटाची ताकद वाढली आहे. या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाही जबरदस्त हादरा दिला, मुंबईतील राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

वरळी विभागातील सर्वोदय नाखवा कोळी सहकारी संस्थेचे सदस्य, कोळी नाखवा संघाचे सदस्य, जिजामाता नगरचे रहिवासी अंधेरी विभागातील संभाजी नगर, कुलाबा विभागातील मांडवी कोळीवाडा, चिरा_बाजार येथील एस के पाटील गार्डन परिसरातील रहिवासी, भुलेश्वर, काळबादेवी आणि अंधेरीतील श्रमिक संघर्ष सेनेचे पदाधिकारी, वर्सोवा, सातबंगला, वांद्रे शासकीय वसाहत, विक्रोळी कन्नमवार नगर, गोरेगाव, दिंडोशी येथील नागरिकांचा समावेश होता.



शिंदे गटाकडूनही पक्ष विस्ताराचे काम सुरु आहे त्याला आता यश मिळत आहे.  याच प्रसंगी मुंबई महानगरपालिकेत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना एक वेतन दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आरोग्य सेविका भगिनी तसेच राष्ट्रीय शिक्षक कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी देखील दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भेट घेऊन आभार व्यक्त केले.



अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121