मुंबई : यंदाही गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा, 'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे'द्वारे कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफी देण्यात आली आहे. कोकणात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य सरकारतर्फे घोषणा केली आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही मुंबई-गोवा, मुंबई-कोल्हापूर मार्गावर नियोजन असेल.
खड्डे दुरुस्ती, पोलीस, वाहतूक पोलीस, अशा सर्व उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली होती. कोकणातील मार्गावर टोल सवलत, टोल स्टिकर देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानिमित्त नागरिकांनी आपल्या गाडीची माहिती दिल्यानंतर त्यांना स्टीक दिले जाईल. गणेशोत्सवाच्या दोन दिवसांपूर्वी आधी आणि विसर्जनाच्या दोन दिवसांनंतर ही सवलत जाहीर करण्यात आहे.
टोल नाक्यांवर वाहनांची रांग लागलेली असते. मुंबई-गोवा महामार्ग आणि एक्स्प्रेस वे ने कोल्हापुरमार्गे कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी मिळाली आहे. गणेशोत्सवाला आता अवघे पाच दिवस उरले आहेत.
"