"सचिन वाझेंना पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ दिला जातोय"

    10-Mar-2021
Total Views | 75

Sachin Vaze _1  


मुंबई : सचिन वाझेंनीच माझ्या पतीचा खून केल्याचा थेट आरोप मनसूख हिरेन यांच्या पत्नी विमला मनसुख यांनी पत्राव्दारे केला आहे. "वाझेंविरोधात सकृतदर्शनी भक्कम पुरावे असतानाही ठाकरे सरकार खुन्यांना पाठीशी घालत आहे," असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला.
 
 
 
विरोधी पक्षाने कायदा व सुवयवसा या विषयावर नियम २६० अन्वये दिलेल्या प्रस्तावावर गृहमंत्री अनिल देशमुख विधान परिषदेत उत्तर देत असताना हरकतीचा मुद्दा उपस्थित करुन दरेकर यांनी सचिन वाझेंच्या अटकेची मागणी केली. दरेकरांनी असेही सांगितले की, ठाकरे सरकारच्या कार्यपद्धतीविषयी संशय व्यक्त केला जातोय.
 
 
पूजा चव्हाण प्रकरणातही ठाकरे सरकारने २० दिवस एफआयआर दाखल करून घेतला नाही, त्यातही असाच वेळकाढूपणा केला, अरुण राठोड आजही गायब आहे, हॉस्पिटलमध्ये भरती झालेली पूजा अरुण राठोड कोण आहे, याचाही अजून पत्ता लागलेला नाही, लॅपटॉपमधील पुरावेही गायब करण्यात आलेले आहेत, पुरावे नष्ट झाल्यानंतर संजय राठोडांचा राजीनामा घेतला गेला.
 
 
हिरेन मनसुख प्रकरणातही ठाकरे सरकार असाच वेळकाढूपणा करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे का, असा संशय माझ्यासारख्या व्यक्तीला वाटत असून महाराष्ट्राची जनतेच्या मनातही हेच प्रश्न आहेत, महाराष्ट्रात खुलेआम हत्या होत असून राज्यातील जनतेचा या महाविकास आघाडी सरकारवर विश्वास राहिलेला नाही.
 
त्यामुळे सकृतदर्शनी पुरावे असलेल्या सचिन वाझेंना तत्काळ अटक करा, अशी मागणी दरेकरांनी केली. याच गोंधळात विधान परिषदेची विशेष बैठक स्थगित करण्यात आली, त्यानंतर सभागृहाची नियमित बैठक् सुरु झाल्यानंतर दरेकरांनी तीच मागणी पुन्हा लावून धरल्याने प्रश्नोत्तराचा तास देखील स्थगित करण्यात आला.




अग्रलेख
जरुर वाचा
महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची नाही! - मंत्री आशिष शेलार; राज्यातील चर्चा अवास्तव, अवाजवी आणि अतार्किक

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची नाही! - मंत्री आशिष शेलार; राज्यातील चर्चा अवास्तव, अवाजवी आणि अतार्किक

“महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती असून, राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेची तिसरी भाषा म्हणून सक्ती करण्यात आलेली नाही. तर, पूर्वीपासून पाचवी ते आठवीपर्यंत असलेली हिंदीची सक्ती आमच्या सरकारने काढून पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी उपलब्ध करुन दिली, तसेच अन्य पर्याय उपलब्ध करून दिले. त्यामुळे राज्यात सध्या सुरू असलेल्या चर्चा अवाजवी, अतार्किक आणि अवास्तव आहेत. आम्ही मराठीचे आणि विद्यार्थी हिताचे खंदे पुरस्कर्ते आहोत”, अशी स्पष्ट भूमिका मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि राज्याचे सांस्कृतीक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121