दूध, इंधन आणि वीज निर्मितीसाठी पाकिस्तान पाळणार हे वर्ष ‘गाय वर्ष’

    05-Feb-2021
Total Views | 107

गाय वर्ष_1  H x
  
 

भारतीय उपखंड आणि चीनमध्येही गाईचे महत्व वाढू लागल्याचे चित्र

 
 
 
पुणे: पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी हे वर्षे ‘गाय वर्ष’ मानायचे ठरविले आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या अतिहलाखीची आहे. गेल्या पंचवीस वर्षात त्या देशात औद्योगिक प्रकल्प असे फारसे उभे राहिले नाहीत. त्यातून मार्ग काढण्यासाठी कांही शेतकर्‍यांनी गांजा, अफू, चरस यांची शेती करून पाहिली. त्यातून निर्यातीला वावही मिळाला पण तरुण पिढी हाताबाहेर गेली. याऐवजी गाईवर लक्ष दिले तर एका बाजूला जगाच्या बाजारात दुधाची आणि दुधाच्या पदार्थांची निर्यातही करता येईल आणि इंधनाचा प्रश्न सोडविण्यासाठी गाईच्या शेणावरील संशोधनाला गती देण्यात येईल.
 
 
 
भारतात गोविज्ञानाच्या बातम्या येत आहेत, त्यावर पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, ‘गोबर से एनर्जी निकाल रहा है तो हम भी कहॉ कुछ पीझे नही हटेंगे’ मग त्यासाठी चीन मदत करू शकतो का, याची माहिती घेतली. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, तेथे शेणावर काही संशोधन झालेले नाही पण पाकिस्तानातील ‘बॉब इंडिकस’ या गाईवर जर अधिक लक्ष दिले तर त्या सध्यापेक्षा चारपट अधिक दूध देवू शकतात. (बॉब इंडिकस गाय म्हणजे भारतीय वंशाची मानेवर वशिंड असलेली गाय) पाकिस्तानमधील मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर क्लायमेट चेंजच्या झरताज गुल यांचे म्हणणे असे की, कराचीतील स्थानिक बससेवा गेली काही वर्षे गाईच्या शेणाच्या आधारे मिळणार्‍या गॅसवरच सुरू आहे. त्यात आता वाढ करण्यात येईल. पाकिस्तानात तो देशव्यापी कार्यक्रम व्हावा, एवढे नियोजन आणि तंत्रज्ञान त्या देशाकडे नाही.
 
 
"गोवंशाच्या शेणापासून एनर्जी निर्माण होऊ शकते,हा मुद्दा सध्या राष्ट्रीय कार्यक्रम करण्यावर आम्ही भर देत आहोत. सध्याचं तंत्रज्ञान प्राथमिक आहे पाकिस्तानात अजून ते तंत्रज्ञान तेवढे विकसित झालेले नाही. पण पर्यावरणाची हानी रोखण्यात गाईचे शेण मोठी भूमिका बजावू शकते"
- राज्यमंत्री झरताज गुल.
 
 
 
या विषयाचा प्रत्यक्ष पाठपुरावा राज्यमंत्री झरताज गुल करत आहेत पण बाहेरील तंत्रज्ञान उपलब्ध करण्याचा पाठपुरावा मात्र पंतप्रधान इम्रान खान करत आहेत. त्यांचे म्हणणे असे आहे की, चीन आणि हॉलंड यांनी पाकिस्तानला गाईचे दूध चारपट करणारे तंत्रज्ञान देण्याचे मान्य केले आहे. त्यासाठी शेतकर्‍यांचे प्रशिक्षण आणि त्यांनी गाईसाठी कर्ज देण्याची योजना तयार ठेवली आहे. याबाबतच्या बातम्या अनेक प्रसारमाध्यमांनी दिली असतील तरी ‘द प्रिंट’ या माध्यमाची बातमी जगभर मोठ्या प्रमाणावर प्रसारीत झाली आहे.
 
 
पाकिस्तानात एका बाजूला गाईचे दूध यातून पोषण आणि विदेशी चलन हा मुद्दा त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर दिसू लागला आहे. आणि दुसर्‍या बाजूला देशातील इंधन आणि वीज हाही मुद्दा शेणाच्या आधारे सोडविण्याचा उल्लेख राज्यमंत्री झरताज गुल यांनी केला आहे. भारताच्या दृष्टीने पाकिस्तानमधील गाईंचे वैशिष्ठ्य असे की, भारतातील महत्वाचे गोवंश ही पाकिस्तानात आहेत. साहिवाल, कांकरेज, गीर, थारपारकर, हरियान्वी, हे गोवंश सिंधू खोर्‍यात आहेतच पण सर्वात उंचीचा मानला जाणारा ‘भगनूर’ हा गोवंश बलुचिस्थानमध्ये आहे.
 
 
 
भारतात गोविज्ञानाला गती आल्यापासून भारतीय उपखंड आणि चीनमध्येही गाईचे महत्व वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे. काही महिन्यापूर्वी श्रीलंकेने गोहत्याबंदीचा कायदा संमत केला. त्यानंतर आग्नेय आशियातही त्या विषयाला चालना मिळाली. गेल्या वर्षीपासून चीननेही गोपालनाला महत्व दिले आहे. तेथील गरीब राज्य म्हणून मानला जाणारा ‘गन्सू' प्रॉव्हिन्समध्ये शेतकर्‍यांना पाच कोटी गाई वितरीत केल्या आहेत. परंतु अभ्यासकांच्या मते, पाकिस्तानमध्ये सध्या गाय या विषयाला महत्व आले आहे, म्हणजे तेथे होणारी गोहत्या कमी झाली आहे, असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरणार आहे.
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121