शिवजयंतीवर निर्बंध , रयतेच्या राज्यात मोगलाई - देवेंद्र फडणवीस

    19-Feb-2021
Total Views | 137

devendra_1  H x



नागपूर 
: महाराष्ट्रात राजकीय पक्षाचे मेळावे जोरात घेतले जात आहेत. सत्तारूढ पक्षाचे मोर्चेही मोठ्या गर्दीत होत आहेत. मग शिवजयंतीवरच निर्बंध का आणले? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत, रयतेच्या राज्यात मोगलाई आली असल्याची टीका त्यांनी केली.


फडणवीस म्हणाले की, आम्ही हिंदू म्हणून स्वतंत्र भारतात जगत आहोत. शिवरायांची जयंती आमच्यासाठी प्रेरणा आहे. त्यामुळे जन्मोत्सवावर निर्बंध चुकीचे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली पाहिजे. पण याची आठवण शिवजयंतीवेळीच का, मोठ्या पक्षांच्या मेळाव्याला का होऊ नये या सरकारला. शिवजयंतीवरच निर्बंध का आणले? रयतेच्या राज्यात मोगलाई आली आहे.



 जनतेला मुर्ख बनविण्याचे काम हे करत आहेत

राज्य सहकारी बँक घोटाळ्यात सहकार विभागाने अजित पवार यांना क्लीनचिट दिली आहे. यावर फडणवीस म्हणाले की, सहकार विभागाचा अहवाल आला आहे. त्याबद्दल फार माहिती नाही. पण जो अहवाल आला आहे, त्यावर आताच बोलणे योग्य होणार नाही. यामुळे न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर बोलणे योग्य राहील.
जनतेला मुर्ख बनविण्याचे काम हे करत आहेत असे फडणवीस यांनी म्हटले.




आत वेगळे बोलायचे आणि बाहेर वेगळे असे काँग्रेसचे आहे


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वीज बिल माफी करायला हवी अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे म्हटले आहे, यावर बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. नाना पाटोले हे सत्तेत राहून विरोधी पक्षात असल्याची मजा घेत असल्याचा टोला लगावत फडणवीस म्हणाले, काँग्रेस सत्तेत आहे. सत्तेत राहून असे काही होत नाही, काँग्रेसच्या ऊर्जामंत्र्यांनी यावर ठोस निर्णय घ्यायला हवा. आत वेगळे बोलायचे आणि बाहेर वेगळे, असे बोलून सरकार जनतेला मूर्ख बनवण्याचे काम करत असल्याची टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली.




याचिकाकर्त्यांनी न्यायालयात तसे पुरावे सादर करावे
 
ऍड. असीम  सरोदे यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी एकनाथ खडसेंना वाचविण्यात तुमचा हात होता आणि तुम्ही सुद्धा गुन्हेगार असल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना याचिकाकर्त्यांनी न्यायालयात तसे पुरावे सादर करावे, न्यायालयाने विचारल्यास त्यावर उत्तर देऊ असेही फडणवीस म्हणाले.






संविधान वाचले नाही ते लोक अशा पद्धतीने भाष्य करतात
 
राज्यपाल हे 12 आमदारांच्या नियुक्तीवर बोलत नाहीत, पण अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल बोलतात, त्यावरून ते भाजपचे कार्यकर्ते आहेत असा आरोप केला जात आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे नियम वाचले नाहीत, संविधान वाचले नाही ते लोक अशा पद्धतीने भाष्य करत आहेत. संविधान वाचले असते तर त्यात स्पष्ट नियम केले आहेत. ज्यावेळी विधानसभा अध्यक्षपद हे रिकामे होते त्यावेळी तात्काळ नवीन अध्यक्षाची तारीख नेमून द्यावी, त्या तारखेला गुप्त मतदान पद्धतीने व्हावे, असेही फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.





विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेचा विश्वासघात केला

 या सरकारने विदर्भ विकास महामंडळ बंद करत विदर्भ आणि मराठवाड्याचे पैसे पळवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. आता तो पैसा थांबवू शकत नाही. पैसा पळवायला सुरुवात झाली आहे. येत्या काळात आणखी पैसा पळवताना दिसेल. याचाच अर्थ सरकारने वैधानिक विकास महामंडळ बंद करुन विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेचा विश्वासघात केला आहे असे फडणवीस यांनी म्हटले.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121