पुण्यातील महिला आत्महत्या प्रकरणी मंत्र्यांच नाव,सखोल चौकशीची फडणवीसांची मागणी

    11-Feb-2021
Total Views | 213
 
 
devendra_1  H x
 
 

  सखोल चौकशी करावी. प्रकरण दाबू नये.

 
 
पुणे :  पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी करावी. प्रकरण दाबू नये. या प्रकरणात संशयाचे वर्तुळ तयार झाले आहे, असे वक्तव्य विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पुण्यातील पूजा चव्हाण या तरुणीने केलेल्या आत्महत्या प्रकरणात एका मंत्र्यांच्या नावाची चर्चा होत असल्याने भाजपने हे प्रकरण लावून धरले आहे. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
 
 
 
रोना विल्सन यांच्याबाबत अहवाल सरकारने फेटाळला
 
तसेच पुण्यातील एल्गार परिषद प्रकरणात अटकेत असलेल्या रोना विल्सन यांच्याबाबत वॉशिंग्टन पोस्ट मध्ये छापून आलेला अहवाल हा खासगी संस्थेने केलेला अहवाल आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी या खासगी संस्थेला रोना विल्सन यांनीच काम दिले होते, असे देखील फडणवीस म्हणाले. हा अहवाल सरकारने फेटाळला असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
 महापालिका निवडणुकीत आम्हाला नवीन मित्र जोडण्याची गरज नाही
 
पुणे महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपाकडून केल्या गेलेल्या विविध प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या कामाबाबत समाधानी आहे, असे फडणवीस म्हणाले. तसेच येत्या महापालिका निवडणुकीत आम्हाला नवीन मित्र जोडण्याची गरज नाही आम्ही स्वबळावर जिंकू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
 
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121