शास्त्री-कोहली जोडीचा आजचा अखेरचा सामना

    08-Nov-2021
Total Views | 59
kohli shastri_1 &nbs
 




दुबई
: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहली सोमवारी त्याच्या कर्णधारपदावर अखेरचा सामना टी-२० वर्ल्ड कप सामन्यात खेळणार आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांचा कोच म्हणून शेवटचा सामना असेल. अश्यारीत्या, भारतीय क्रिकेट विश्वात शास्त्री-कोहली युग संपुष्टात येणार असल्याची चर्चा क्रीकेटप्रेमींमध्ये आहे.



टी-२० मध्ये भारतीय संघाचा हा शेवटचा सामना नामिबिया विरुद्ध असेल. हा सामना जिंको किंवा हरो टीम इंडिया रविवारीच अफगाणिस्तानच्या पराभवासह विश्वचषकातून बाहेर झाली आहे. रविवारी अफगाणिस्थान विरुद्ध झालेल्या सामना झाल्यानंतर भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर झाला. पत्रकार परिषदेत विराट कोहलीने स्पष्ट केले होते कि, हा सामना त्याच्यासाठी संघाचा कर्णधार म्हणून आणि टी-२० तील अखेरचा सामना असेल.. तेच, रवी शास्त्रीही त्यांच्या प्रशिक्षकाच्या सेवेतून निवृत्ती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.  
 


क्रिकेट विश्वातले हे दोन दिग्गज त्यांचा शेवटचा सामना नक्कीच रंजक खेळवण्याचा प्रयत्न करतील. मात्र, क्रिकेट प्रेमी नक्कीच हळहळ व्यक्त करतील कि, कोहली-शास्त्री एकत्र असताना त्यांनी कुठलेही विशेष विक्रम रचले नाहीत. रवी शास्त्री २०१७ पासून भारतीय संघाचे प्रशिक्षक आहेत. 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121