शालेय विदयार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी नवरात्रोत्सवाचा अनोखा उपक्रम

धर्मराज फाऊंडेशनचा उपक्रम

    15-Oct-2021
Total Views | 103


patil photo_1  
 
 
डोंबिवली  : धर्मराज फाऊंडेशनतर्फे साजरा केल्या जाणाऱ्या जय अंबिका सार्वजनिक नवरात्रोत्सवात शालेय साहित्याची सजावट केली आहे. लहान मुलांना शाळेची गोडी लागावी यासाठी हा प्रयत्न केला आहे, अशी माहिती भाजपा डोंबिवली ग्रामीण सरचिटणीस रविंद्र पाटील यांनी दिली आहे.

कोरोना काळात दोन वर्ष शाळा बंद आहेत. लहान मुले शाळेपासून दूर असल्याने शालेय गळतीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. या मुलांना पुन्हा शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी नवरात्रोत्सवातील सजावटीसाठी वापरण्यात आलेले साहित्याचे मुलांना वाटप करण्यात येणार आहे. गेल्या दहा वर्षापासून नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. दरवर्षी परिसरातील नागरिकांना गरबा आणि दांडियाचे आयोजन केले जाते. पण यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळून नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे गरबा आणि दांडियाचे आयोजन केले नाही. तरूणाईचा हिरमोड झाला आहे. गेल्या दोन वर्षापासून गरब्याचे आयोजन केले नाही. मनोभावी देवाची स्थापना करण्यात येईल असे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले. त्याप्रमाणे मनोभावे देवाची स्थापना केली आहे. कोरोना महामारी दूर होऊ अशी प्रार्थना दुर्गा मातेच्या चरणी केली आहे. या वेळी महेंद्र पाटील उपस्थित होते. तसेच श्रीजन संमेलनी फाऊंडेशनतर्फे मास्क वापरा आणि कोरोनापासून दूर राहा असा संदेश दिला जात आहे. तसेच भक्तांना प्रसादासोबत मास्कचे वाटप केले जात आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी मास्क वापरणे हा एकमेव पर्याय आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे असाच संदेश त्यांनी आपल्या भक्तांना दिला आहे. कोरोना प्रादरुभाव पाहता भक्तांना संपूर्ण फळ प्रसादामध्ये दिले जात आहे.
 

--------------------------------------------------------------
अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात सर्वाधिक उंच पूल ; १२ मजली इमारतीच्या उंचीचा पूल प्रगतीपथावर

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात सर्वाधिक उंच पूल ; १२ मजली इमारतीच्या उंचीचा पूल प्रगतीपथावर

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी साबरमती नदीवर ३६ मीटर उंच म्हणजेच १२ मजली इमारतीइतक्या उंचीचा पूल सध्या अहमदाबादमधील साबरमती नदीवर बांधला जात आहे. एकूण ४८० मीटर लांबीचा हा पूल पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद–दिल्ली मुख्य मार्गालगत बांधला जात आहे. ज्याची उंची सुमारे १४.८ मीटर आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर, तो केवळ आधुनिक संपर्काचे प्रतीक ठरणार नाही तर हाय-स्पीड पायाभूत सुविधांमध्ये व अस्तित्वातील रेल्वे नेटवर्कमध्ये सुसंवाद कसा साधता येतो याचे उत्कृष्ट उदाहरणही ठरेल...

शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

"भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि अण्णा भाऊ साठे यांसारखे थोर विचारवंत असताना, लेनिन आणि मार्क्ससारख्या परकीय विचारवंतांची गरजच काय?” असा थेट सवाल ज्येष्ठ शाहीर संदेश विठ्ठलराव उमप यांनी उपस्थित केला. अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाएमटीबी’ या युट्यूब वाहिनीवरील विशेष मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांच्यासोबत गायिका रागिणी मुंबईकर आणि ढोलकीवादक महेश लोखंडे हेही उपस्थित होते...

डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

डोंबिवली एमआयडीसी परिसरात वीजवितरण कंपनीने विजेच्या तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या कापल्या पण त्यानंतर छाटलेल्या फांद्या रस्त्यावर तशाच टाकून दिल्या होत्या. महावितरण, केडीएमसी आणि एमआयडीसी या सर्वाचा निष्काळजीपणा आणि कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. त्या विरोधात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी आवाज उठविला होता. या वृत्ताला ‘दैनिक मुंबई तरूण भारत’ ने दि. 1 ऑगस्ट रोजी प्रसिध्दी दिली. हे वृत्त प्रसिध्द होताच खडबडून जाग आलेल्या यंत्रणेकडून रस्त्यावरील ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121