मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हीच पत्रकार रायकर यांना श्रद्धांजली

    02-Sep-2020
Total Views |

nitesh rane_1  


मुंबई :
टीव्ही पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन झाल्यानंतर आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींचा प्रश्न ऐरणीवर आला असून सर्व स्तरातून सरकारवर टीका होत आहेत. आरोग्य सुविधांच्या या अवस्थेवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे.

नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'पुण्यात टीव्ही पत्रकार रायकर यांचा खुन झाला? असा आरोप त्यांनी केला आहे. हे सत्य आहे. कारण, महाराष्ट्र शासनाच्या गलथान कारभारामुळं जीव गेला. करोना काळात निस्वार्थी भावनेनं सेवा देणारे पत्रकार ही सुरक्षित नाहीत. त्या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या. तीच खरी श्रद्धांजली,' अशी मागणी त्यांनी केली आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही मागणी केली. दरम्यान,कार्डिअॅक अँब्युलन्सच्या अभावी पुण्यात पत्रकार रायकर यांच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकारण तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयावर बोलणे टाळले. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रायकर यांच्या मृत्यूविषयीचा अहवाल मागवला आहे. 'या यंत्रणेनेच माझ्या भावाचा जीव घेतला' अशी संतापाची भावना पांडुरंग रायकर यांच्या बहिणीने व्यक्त केली
अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुक्त पत्रकारितेचा पुरस्कार करते!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुक्त पत्रकारितेचा पुरस्कार करते!

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. स्वतंत्र भारतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खऱ्या अर्थाने मुक्त पत्रकारितेचा पुरस्कार केला " असे प्रतिपादन द इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे संचालक अनंत गोयंका यांनी केले. विश्व संवाद केंद्र, मुंबई आयोजित रौप्य महोत्सवी देवर्षी नारद पत्रकार सन्मान सोहळा २०२५ येथे ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विश्व संवाद केंद्राचे प्रमुख सुधीर जोगळेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी राजाभाऊ मुळे, निबे ऑर्डनन्स अँड मेरीटाईम लिमिटेडचे गणेश निबे, एडलवाईस ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121