चीनच्या सैन्याने लडाखमधील कारवाया बंद कराव्यात!

    27-Jun-2020
Total Views | 72

china_1  H x W:


चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिस्री यांनी चीनला सुनावले खडे बोल!

नवी दिल्ली : बॉर्डरवर सैन्य वाढवण्याचा प्रयत्न केल्यास फक्त शांती प्रक्रीयेवरच परिणाम पडणार नाही, तर दोन्ही देशांचे संबंधही खराब होऊ शकतात, असा इशारा भारताने चीनला दिला आहे. पूर्व लडाखमधील कारवाया बंद कराव्यात असे चीनला सांगण्यात आले आहे. चीनमध्ये भारताचे राजदूत विक्रम मिस्री यांनी एका वृत्तसंस्थेशी शुक्रवारी केलेल्या बातचीतदरम्यान हे सांगितले.


मिस्री म्हणाले की, बॉर्डरवर चीनी सैनिकांमुळे दोन्ही देशांच्या संबंधावर वाईट वरिणाम पडला आहे. आता संपूर्ण जबाबदारी चीनची आहे की, त्यांना हे संबंध कसे ठेवायचे आहेत? चीनने भारतीय सैनिकांच्या नॉर्मल पेट्रोलिंगमध्ये अडथळा आणू नये.


मिस्री यांनी लद्दाखमध्ये गलवान व्हॅलीवर चीनच्या दाव्याचे खंडन केले. त्यांनी म्हटले की, अशा खोट्या गोष्टींमुळे चीनला काहीच फायदा होणार नाही. बॉर्डरवर आमच्याकडून ज्या कोणत्या अॅक्टीव्हिटीज होतात, त्या लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलवर आमच्या सीमेत होतात. चीनला महत्वाच्या नसलेल्या अॅक्टिविटीज थांबवण्याची गरज नाही. हे चकित करणारे आहे की, ज्या सेक्टरमध्ये कधीच वाद झाला नाही, अशा ठिकाणीदेखील चीनने कारवाया केल्या.


तर, भारतातील चीनचे राजदूत सुन वेडॉन्ग यांनी गुरुवारी म्हटले होते की, बॉर्डरवर तणाव कमी करण्याची जबाबदारी भारताची आहे. यावर मिस्री म्हणाले, आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, आता सीमेवर जी परिस्थिती उद्भवली आहे, त्याला सर्वस्वी चीन जबाबदारी आहे. एप्रिल आणि मेमध्ये लडाखमध्ये एलएसीवर चीनच्या कारवाया वाढल्या होत्या, यामुळे आमच्या सैन्याला नॉर्मल पेट्रोलिंगमध्ये त्रास होत होता.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121