संजीव जयस्वाल यांनी घेतला अलगीकरण केंद्रातील सुविधांचा आढावा

    13-May-2020
Total Views | 45

Isolation ward_1 &nb


परिमंडळ १ मध्ये केली पाहणी


मुंबई : कोरोना विषाणू संसर्ग सर्व अतिरिक्त आयुक्तांची विभागवार अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक केली आहे. त्यानुसार संजीव जयस्वाल यांनी परिमंडळ १ ची पाहणी करून सुविधांचा आढावा घेतला. कोरोनाला रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून ठिकठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र, अलगीकरण केंद्र, अन्न वितरण केंद्र आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परिमंडळ १ मध्ये या सेवा-सुविधांची प्रत्यक्ष स्थिती पाहण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल यांनी विविध ठिकाणी भेट दिली.


उपआयुक्त हर्षद काळे यांच्या उपस्थितीत जयस्वाल यांनी ई विभाग कार्यालयामध्ये सविस्तर माहिती जाणून घेतली. यानंतर भायखळा परिसरात ताडवाडी प्रतिबंधित क्षेत्र, रिचर्डसन क्रूडास येथील कोरोना काळजी केंद्र (सीसीसी २), कम्युनिटी किचन, बी विभाग हद्दीतील हॉटेल बिस्मिल्ला तसेच नजम बाग येथील कोरोना काळजी केंद्र (सीसीसी १) या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सेवा-सुविधांची पाहणी करण्यात आली. ग्रँट वैद्यकीय जिमखाना व चर्नी रोड येथील मित्तल आयुर्वेदिक रुग्णालयामध्येही सीसीसी २ व्यवस्थेचे निरीक्षण करण्यासाठी श्री. जयस्वाल यांनी भेट दिली. डी विभागाच्या हद्दीतील एमपी मिल कम्पाऊंड येथे एसआरए इमारतीतील सीसीसी २ सुविधा, आदर्श पॅलेस हॉटेलमधील सीसीसी १ व्यवस्था, ए विभागातील सुंदर नगर आणि सुखदवाला येथे सीसीसी २ सेवेसह ए विभागामध्ये अन्न वितरणासाठी सुरु असलेल्या फूड किचन व्यवसंस्थेची जयस्वाल यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.


कोरोना केंद्रांमध्ये राहत असलेल्या व्यक्तींच्या भेटी घेऊन त्यांना कोणकोणत्या बाबींमध्ये आणखी सुधारणा अपेक्षित आहेत, सध्या देण्यात असलेल्या सुविधांमध्ये समाधान वाटते किंवा कसे, याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. कम्युनिटी किचनमध्ये कार्यरत कर्मचाऱ्याना येणाऱ्या अडचणी, किचनमधून पुरवले जाणारे अन्नाचा दर्जा यांचेही जयस्वाल यांनी निरीक्षण करुन आवश्यक तेथे सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित सहाय्यक आयुक्तांना दिले. यावेळी सहाय्यक आयुक्त चंदा जाधव, नितीन आर्ते, चक्रपाणी अल्ले, प्रशांत गायकवाड, मकरंद दगडखैरे हे आपापल्या विभाग कार्यालयाच्या पाहणीप्रसंगी उपस्थित होते.
अग्रलेख
जरुर वाचा
२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अनुभव घेतोय. कोणीही, कधीही, कुठेही जाऊ शकतो, मनासारखे (झेपेल त्याप्रमाणे) काहीही करू शकतो. मग विषय कोणताही असो. ‘कोरोना’चा असो किंवा चिनी घुसखोरीचा, शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा विपर्यास करण्याचा, दि. २६ जानेवारी रोजीच्या राजधानीत घातलेल्या धुडगुसाचे निर्लज्ज समर्थन करण्याचा, खलिस्तानचे समर्थन करण्याचा, ‘वॅसिन’च्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचा, स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर निर्लज्जपणे केंद्र सरकारवर फोडण्याचा, केतकीच्या कवितेवरून तिला चार महिने तुरुंगवारी घडविण्याचा आणि मोदींना ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121