दिलासादायक ! ७ दिवसात ८० जिल्ह्यात एकही नवा रुग्ण नाही

    28-Apr-2020
Total Views | 44

dr harsh vardhan_1 &



नवी दिल्ली
: केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी मंगळवारी स्वायत्त संस्था असणाऱ्या जैवतंत्रज्ञान विभागाशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, गेल्या सात दिवसांपासून देशभरातील ८० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. त्याचबरोबर गेल्या २४ दिवसात १७ जिल्ह्यांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही.




हर्षवर्धन म्हणाले, 'मागील सात दिवसांपासून ८०जिल्ह्यांत कोणताही नवीन रुग्ण आढळला नाही तर ४७ जिल्ह्यांत मागील १४ दिवसांत एकही नवा रुग्ण दाखल झाला नाही. याचबरोबर १७ जिल्ह्यांत मागील २८ दिवसांत एकही नवीन रुग्ण दाखल झाला नाही. आरोग्यमंत्री पुढे म्हणाले की, गेल्या १४ दिवसांत आपल्याकडे रुग्ण दुपटीचे दर ८.७ होता. जो मागील आठवड्यापासून १०.२ झाला होता. हा दर मागील तीन दिवसांपासून अंदाजे १०.९ आहे. ही भारतासाठीची मोठी सकारात्मक बाजू आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!; भारताचे पाकवर टीकास्त्र

"ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!"; भारताचे पाकवर टीकास्त्र

(India on Trump-Munir meet) पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांची ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांऐवजी लष्करप्रमुख ट्रम्प यांना भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवर आता भारताने प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे...

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121