'लघु उद्योग भारती'तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन

    20-Apr-2020
Total Views | 61

Laghu Udyog Bharati_1&nbs
 
 

लघु उद्योगांना दिलासा द्या !

औरंगाबाद : 'लॉकडाऊन' काळात अनेक उद्योग ठप्प असून यातून सावरण्यासाठी राज्य सरकारने या क्षेत्राला दिलासा द्यावा, अशी मागणी लघु उद्योग भारतीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार व उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच राज्याचे मुख्य सचिव यांनाही हे निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती लघू उद्योग भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र वैद्य, महासचिव भूषण मर्दे व कोषाध्यक्ष निर्मलकुमार ओझा यांनी दिली आहे.
 
 
केंद्रीय सुक्ष्म व लघू उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनाही लघु उद्योग भारतीतर्फे निवेदन देण्यात आले आहे. 'कोरोनाच्या काळात सुक्ष्म व लघू उद्योग क्षेत्र आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. महाराष्ट्र सरकारने वीजबिलात सवलत, वीजपुरवठा खंडीत न करणे, नव्या टॅरीफला स्थगिती, जुन्या वॅटचा परतावा, प्रलंबित अनुदान, स्थानिक कर व भाडे, व्यवसाय कर, आदींना मुदतवाढ मिळावी', अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121