कल्याण-कसारा मार्गिका वर्षअखेरपर्यंत होणार पूर्ण

    23-Feb-2020
Total Views | 130
Kalyan-Kasara _1 &nb



चार वर्षांपासून रखडले होते काम



शहापुर (प्रशांत गडगे) : मध्य रेल्वेवरील कल्याण-कसारा स्थानकादरम्यान तिसरे आणि चौथ्या मार्गिकेचे काम सुरू आहे. परंतु, भूसंपादनातील अडचणीमुळे हे काम चार वर्षापासून रखडले आहे. आता तिसऱ्या मार्गीकेचे भूसंपादन अंतिम टप्प्यात आले असून त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
 
 
नव्या मार्गिकेमुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा मार्ग मोकळा होण्याबरोबरच लोकलच्या आणखी २४ फेऱ्या वाढण्याची होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प मार्च २०२० पर्यंत पूर्ण करायचा होता मात्र फक्त तिसऱ्या मार्गे चे काम या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रकल्प लांबल्यामुळे आंदाजित ७९३ कोटीचा प्रकल्प खर्च १०० कोटींनी वाढुन ९०० कोटीवर गेला आहे. कल्याण-कसारा दरम्यान उपनगरीय रेल्वेसेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी केवळ दोन मार्गिका आहेत. त्यात या मार्गिकेवर मेल एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य द्यावे लागत असल्यामुळे या मार्गावर लोकल नेहमिच विलंबाने धावतात. एक्सप्रेस किंवा मालगाडी अपघात झाल्यास रेल्वे मार्ग बंद होतो तर लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे उपनगरीय सेवेला फटका बसतो.
 

 
त्यामुळे या दोन मार्गांवर जादा ताण येत असल्याने तिसऱ्या मार्गाची मागणी प्रवासी संघटना सातत्याने करत आहेत. समस्येवर उपाय म्हणून कल्याण-कसारा दरम्यान तिसरी व चौथी मार्गिका तयार करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने २०११ मध्ये तिसर्यार मार्गीकेला मान्यता दिली मात्र कामाला प्रत्यक्ष सुरुवात २०१६ मध्ये झाली. यंदाच्या अर्थसंकल्पात ५५ कोटीची तरतूद करण्यात आली असली तरी भूसंपादन अभावी एक काम पूर्ण होऊ शकले नाही. आता भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून वर्षाच्या अखेरपर्यंत हे मार्गिका खुली करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे या सूत्रांनी सांगितले आहे.





अग्रलेख
जरुर वाचा
पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा येथे हिंदूंवर आणि पोलिसांवर देखील काही इस्लामिक कट्टरपंथी जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. येथील शिव मंदिराच्या जमिनीवरील अतिक्रमणाविरुद्ध हिंदू समुदायाच्या लोकांनी निषेध केला असता कट्टरपंथींनी मंदिरावरही हल्ला करत मंदिर परिसराची देखील तोडफोड केल्याचे दिसतेय. दरम्यान जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली व परिसरातील दुकाने आणि वाहनांची तोडफोड केल्याचे निदर्शनास येतेय. यात पोलिसांसह अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे...

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या तटबंदीवर उभा असलेला शिवरायांचा ८३ फूट उंच पुतळा केवळ स्मारक नाही, तर मराठा आरमाराच्या तेजस्वी परंपरेचे जागृत प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर निर्माण केलेले भारतीय इतिहासातील पहिले स्वकीय आरमार, ही केवळ दूरदृष्टी नव्हे, तर सागरी सुरक्षिततेची स्वाभिमानी घोषणा होती. या परंपरेला नव्याने उजाळा देण्यासाठी राजकोट किल्ल्याच्या परिसरात ‘शिवआरमार’ संग्रहालय उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. बुधवार, दि. ११ जून रोजी त्यास मंजुरी देण्यात आली...

आता थांबायचं नाही! ओटीटीवर लवकरच; मुंबईच्या खऱ्या नायकांच्या कथेला मिळणार नवा मंच!

"आता थांबायचं नाही!" ओटीटीवर लवकरच; मुंबईच्या खऱ्या नायकांच्या कथेला मिळणार नवा मंच!

भावनिक आणि प्रेरणादायी अशा “आता थांबायचं नाही!” या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवल्यानंतर आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. मुंबई महानगरपालिकेतील श्रमिकांच्या संघर्षमय आणि स्फूर्तिदायक प्रवासावर आधारित असलेला हा चित्रपट सध्या IMDb वर ८.८ इतक्या उत्तम रेटिंगसह प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वैचळ यांनी केलं असून, त्यांनी याच चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. चित्रपटात भारत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि आशुतोष गोवारिकर यांच्या महत्त्वपूर्ण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121