मुंबई : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले होते. यादरम्यान त्यांनी मुंबईतील उद्योजक तसेच सिनेकलाकार, दिग्दर्शकांच्या भेटी घेतल्या. मात्र यावरून शिवसेना व महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावर जोरदार टीका केली होती. या टीकाना भाजपकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जातं आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी २०१७साली मुंबई भेटीदरम्यान आले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांच्या भेटीचा फोटो शेअर करत सवाल उपस्थित केला आहे. ट्विट करत निलेश राणे म्हणतात , "हेच ते उध्दव ठाकरे आहेत ज्यांनी २०१७साली महाराष्ट्रातील उद्योग बंगालमध्ये घेऊन जायला मुंबईत आलेल्या ममता बॅनर्जीचा हॉटेलमध्ये जावून सत्कार केलेला आणि महाराष्ट्रातील उद्योगपती आणि ममता बॅनर्जीच्या मिटींगला शुभेच्छा दिल्या. तेव्हा कुठ गेलेली मराठी अस्मिता? दोन तोंडी मांडगुळ,"अशी उपमा देत त्यांनी शिवसेनेला सवाल केला आहे.