आज नरेंद्र मोदी यांनी जन्मू काश्मीरमध्ये आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सेहत कार्यक्रमाची घोषणी केली. ही योजना जन्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आल्याने येथील १५ लाख कुटुंबाने फायदा होणार आहे.या कार्यक्रमावेळी बोलताना त्यांनी काॅंग्रेसवर अप्रत्यक्षपणे जोरदार हल्ला केला. यासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, "गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये काही जण मला कोसत आहेत, माझ्याविषयी अपशब्दांचा वापर करत आहेत. मला लोकतंत्रचे धडे देत आहेत. त्या लोकांना आज मी आरसा दाखवू इच्छितो. जन्मू-काश्मीरला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर काही महिन्यांमध्येच येथे तीन स्तरीय पंचायतीच्या निवडणूका शांततेत पार पडल्या. मात्र, २०१८ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पाॅण्डेचेरीमध्ये पंचायत आणि महानगरपालिकांचा निवडणूका होत नाही आहेत. मला दिल्लीमध्ये लोकतंत्राचे धडे देणाऱ्या पक्षाची सत्ता पाॅण्डेचेरीमध्ये आहे. असे असताना, लोकतंत्रावर विश्वास नसणारे पाॅण्डेचेरीमधील सरकार मला लोकतंत्राचे धडे देत्यात. २००६ साली याठिकाणी पंचायतीच्या निवडणूका झाल्या होत्या. त्याची वैध्यता २०११ मध्ये संपली. त्यानंतर येथील सरकार निवडणूका होऊ देत नाही आहेत."