श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी पर्वत फेरीसाठी तिनशे ज्यादा बस

    19-Aug-2019
Total Views | 77



नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी पर्वत फेरी होणार आहे. या भाविकांच्या वाहतुकीसाठी एस.टी. महामंडळाच्या वतीने ३०० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. मेळा बसस्थानकाचे काम सुरू असल्याने यंदाही जादा बसेस ईदगाह मैदान येथूनच सोडण्यात येणार आहेत.

आध्यात्मिकदृष्ट्या तिसर्‍या श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे. भाविकांच्या गर्दीच्या दृष्टीने खासगी वाहनांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे भाविक एस.टी. महामंडळाच्या बसेसद्वारे त्र्यंबकेश्वर येथे जात असतात. भाविकांच्या वाहतुकीसाठी यंदाही एस.टी. महामंडळाकडून विशेष नियोजन करण्यात आलेले आहे. पहिल्या दोन श्रावण सोमवारी पावसामुळे येथील गर्दी रोडावल्याचे दिसून आले होते.

मात्र, तिसर्‍या श्रावण सोमवारास विषेश महत्त्व असल्याने आणि त्यातच थोडीफार का होईना, पावसाने विश्रांती घेतल्याने भाविकांची गर्दी या सोमवारी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे महामंडळाच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

नाशिकरोड आणि निमाणीमधूनही जाणार बस

भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता त्र्यंबकमध्ये चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येणार आहे. भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने निमाणी बसस्थानक, नाशिकरोड बसस्थानकासह सिडको येथूनही त्र्यंबकेश्वरसाठी बस मार्गस्थ होणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत श्रावणी सोमवारच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा एसटी महामंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121