जम्मू काश्मीर सीमावर्ती भागात स्वातंत्रदिनाचा जल्लोष

    15-Aug-2019
Total Views | 142


 

राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र येत साजरी केला जल्लोष

 

जम्मू आणि काश्मीर : राजौरी आणि पूंछ जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात हिंदू आणि मुस्लिम बांधवानी अनोखा स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला. कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय आणि स्वातंत्रदिनाचा एकत्रित जल्लोष साजरी केला. राजौरीमधील नागरिकांनी एकत्रित येत तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. 'भारत माता कि जय'च्या जयघोषात मिठाई वाटण्यात आली. भाजपचे राजौरी विधानपरिषद सदस्य विबोध गुप्ता हे देखील रॅलीत सहभागी झाले होते. जम्मू-काश्मीरला न्याय मिळवून देणे आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचे त्यांनी कौतुक केले. रॅलीत स्थानिक प्रतिनिधी नायब पंच मुहम्मद सगीर, खडम मलिक, इक्बाल आणि लतीफ युनूस हे देखील उपस्थित होते. 
 
 
 

 

यावेळी विबोध गुप्ता म्हणाले की, हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत आहेत. पण काही लोक जम्मू-काश्मीरबद्दल खोट्या अफवा पसरवत आहेत. भारताच्या स्वातंत्र्यापासूनच जम्मू-काश्मीरमध्ये राहणारे दलित आणि महिला यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले होते, पण आता त्यांना न्याय मिळेल. केंद्र सरकारचेही त्यांनी यावेळी आभार मानले. राज्यातून दहशतवाद आणि भेदभाव दूर केल्याबद्दल सर्वांनी संयुक्तपणे सरकारचे आभार मानले.
 
 

 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121